मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

  59

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे आहे की मुलांना प्ले स्कूलला कधी पाठवावे. योग्य वयात प्ले स्कूलला पाठवल्याने मुलांना अधिक फायदे होतात.


जसजशी मुले मोठी होतात तसे पालक आपल्या मुलांना प्री स्कूलमध्ये पाठवण्याचा विचार करतात. प्रत्येक आई-वडिलांना वाटते की त्यांच्या मुलांचे भविष्य चांगले असावे तसेच शाळेत जाण्याला त्रास होऊ नये.


मुले जेव्हा व्यवस्थित चालायला तसेच बोलायला आणि एकमेकांमध्ये मिसळायला लागतील तेव्हा प्ले स्कूलला पाठवले पाहिजे. अधिकतर मुलांच्या मेंदूचा ९० टक्के विकास वयाच्या ५ वर्षांपर्यंत होत असतो. या कालावधीत ते लवकर शिकतात आणि नवनवे अनुभव तयार करतात. तुम्ही त्यांना वयाच्या तिसऱ्या अथवा चौथ्या वर्षात पाठवू शकता.


प्ले स्कूलमध्ये मुले एकमेकांशी मिसळून वागायला शिकतात. तसेच त्यांचा सामाजिक विकास चांगला होतो. प्ले स्कूलमध्ये मुले आपल्या भावना समजतात तसेच व्यक्त करणे शिकतात. हे त्यांच्या भावनात्मक विकासासाठी गरजेचे असते. तसेच शाळेत खेळ आणि इतर अॅक्टिव्हिटीजही असतात ज्यामुळे त्यांचा शारिरीक विकासही होतो. प्ले स्कूलमध्ये मुले नवनव्या गोष्टी शिकतात. यामुळे त्यांचा मानसिक विकासही व्यवस्थित होतो.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर