मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

  72

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे आहे की मुलांना प्ले स्कूलला कधी पाठवावे. योग्य वयात प्ले स्कूलला पाठवल्याने मुलांना अधिक फायदे होतात.


जसजशी मुले मोठी होतात तसे पालक आपल्या मुलांना प्री स्कूलमध्ये पाठवण्याचा विचार करतात. प्रत्येक आई-वडिलांना वाटते की त्यांच्या मुलांचे भविष्य चांगले असावे तसेच शाळेत जाण्याला त्रास होऊ नये.


मुले जेव्हा व्यवस्थित चालायला तसेच बोलायला आणि एकमेकांमध्ये मिसळायला लागतील तेव्हा प्ले स्कूलला पाठवले पाहिजे. अधिकतर मुलांच्या मेंदूचा ९० टक्के विकास वयाच्या ५ वर्षांपर्यंत होत असतो. या कालावधीत ते लवकर शिकतात आणि नवनवे अनुभव तयार करतात. तुम्ही त्यांना वयाच्या तिसऱ्या अथवा चौथ्या वर्षात पाठवू शकता.


प्ले स्कूलमध्ये मुले एकमेकांशी मिसळून वागायला शिकतात. तसेच त्यांचा सामाजिक विकास चांगला होतो. प्ले स्कूलमध्ये मुले आपल्या भावना समजतात तसेच व्यक्त करणे शिकतात. हे त्यांच्या भावनात्मक विकासासाठी गरजेचे असते. तसेच शाळेत खेळ आणि इतर अॅक्टिव्हिटीजही असतात ज्यामुळे त्यांचा शारिरीक विकासही होतो. प्ले स्कूलमध्ये मुले नवनव्या गोष्टी शिकतात. यामुळे त्यांचा मानसिक विकासही व्यवस्थित होतो.

Comments
Add Comment

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

बारीक लोकांनी बॉडीबिल्डिंग करताना चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ, नाहीतर...

मुंबई : आजकाल अनेक तरुणांना सुडौल आणि मजबूत शरीर (muscle building) बनवण्याची आवड आहे. यासाठी ते जिममध्ये

कच्चे, उकडलेले की ऑम्लेट? अंडे कसे खाणे ठरते फायदेशीर...घ्या जाणून

मुंबई: अंडी हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. अनेक लोक त्यांच्या आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश करतात. परंतु,

पोट साफ होत नसेल तर सकाळी करा हा उपाय...

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या बनली आहे. चुकीचा आहार, अपुरी झोप आणि बैठी

उपाशी पोटी खा ही ५ फळे, मिळतील अनेक फायदे

मुंबई : सकाळी उपाशी पोटी फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते

महिलांच्या आरोग्यासाठी 'हे' ५ आयुर्वेदिक सुपरफूड्स आहेत गुणकारी, रोजच्या आहारात करा समावेश

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक कामांची तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे त्यांच्या आरोग्याकडे