Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, अनेक दिग्गज मैदानात

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील १४ जागा आणि महाराष्ट्रातील १३ जागांवर मतदान सुरू झाले आहे.या टप्प्यात राजनाथ सिंह, स्मृती इराणी तसेच काँग्रेस नेते राहुल गांधींसह चार केंद्रीय मंत्र्यांच्या नशीबाचा फैसला होणार आहे.


राज्यात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. मुंबईच्या सहा जागांसह राज्यात एकूण मिळून १३ जागांवर मतदान होत आहे. आज उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, दिंडोरी, नाशिक आणि भिवंडी या मतदारसंघात मतदान होत आहे.



पाचव्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार


राज्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियूष गोयल, अभिनेता भूषण पाटील, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड, अरविंद सावंत, यामिनी जाधव, राहुल शेवाळे, अनिल देसाई, रवींद्र वायकर, अमोल किर्तीकर, श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे यांच्या लढती लक्षवेधी ठरणार आहेत.


निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या टप्प्यात ८.९५ कोटी मतदार आपल्या मतधिकाराचा वापर करतील. एकूण ९४३७२ मतदान केंद्र बनवण्यात आले आहेत. यावेळी ९.४७ लाख मतदान अधिकारी ही मतप्रक्रिया पार पडतील.



अक्षय कुमार, अनिल अंबानी यांनी केले मतदान


भारताची नागरिकता मिळाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी विकसित आणि मजबूत भारत हवा आहे. त्यासाठी मतदान केल्याचे अक्षय कुमारने सांगितले. अनिल अंबानी यांनी रांगेत जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावला.

 
Comments
Add Comment

Chief Minister of Keral : अखेर सस्पेन्स संपला ! केरळमचे मुख्यमंत्री ठरले

Chief Minister of Keral : केरळमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, काँग्रेसने (Congress ) व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची

Delhi Bus Rape Case : दिल्ली हादरली! स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार

दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चेत आली आहे. राजधानीत एका खासगी

Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री; सोनं-चांदी ते दूधाच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांत देशाच्या आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात झपाट्याने घडामोडी घडताना दिसत आहेत.

Maharashtra ATS Launches Massive Crackdown : ATS चा धडाका! पाकिस्तानस्थित 'भट्टी गँग'चे जाळे उखडून फेकले; महाराष्ट्रात ४० ठिकाणी छापे, ५७ जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) बुधवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण राज्यात एक मोठी शोधमोहीम राबवली.

Uttar Pradesh Storm : उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून ५६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध जिल्ह्यांना बुधवारी भीषण वादळ आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. या

Monsoon Rain Update : उकाड्यापासून लवकरच सुटका! अंदमानात पुढच्या ४८ तासांत पावसाच्या सरी कोसळणार!

देशभरात उन्हाचा चटका वाढत असतानाच भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) एक दिलासादायक बातमी दिली आहे. नैऋत्य