काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही


पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले!


जमशेदपूर : झारखंडमधील जमशेदपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस (Congress) आणि झारखंड मुक्ती मोर्चावर (Jharkhand Mukti Morcha) जोरदार हल्लाबोल केला. "काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी आहे. काँग्रेस आणि झामुमोसारख्या पक्षांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही. काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी आहे. काँग्रेस आणि झामुमोच्या लोकांना विकासाची फिकीर नाही. त्यांचा संबंध फक्त भ्रष्टाचार आणि खोटे बोलण्याशी आहे. काँग्रेस आणि झामुमोने आपल्या घरात काळ्या पैशाचा ढीग ठेवला आहे," अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला.


पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "काँग्रेस आणि झामुमोच्या लोकांना विकासाचा एबीसीडी सुद्धा माहित नाही. गरिबांच्या मालमत्तेचा एक्स-रे काढणे, एससी-एसटी-ओबीसीचे आरक्षण हिसकावणे, मोदीजींना रोज शिव्या देणे हे त्यांचे काम आहे. या पलीकडे ते विचार करू शकत नाहीत."





"झारखंडमध्ये झामुमोने जमीन घोटाळा केला. त्यांनी गरीब आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, लष्कराच्या जमिनी बळकावल्या. त्यांच्या घरातून जप्त झालेल्या चलनी नोटांचे डोंगर तुमच्याकडून लुबाडलेले आहेत. या अप्रामाणिक लोकांच्या घरात दडवून ठेवलेला पैसा आता मोदी शोधून काढतोय. मी हे पैसे सरकारी तिजोरीत नेण्यासाठी वसूल करत नाही तर मी हे सर्व पैसे ज्यांच्या मालकीचे आहेत, त्या गरीब लोकांना परत करण्याचा मार्ग शोधत आहे. ही मोदींची गॅरंटी आहे," असा विश्वास त्यांनी लोकांना दिला.


"काँग्रेस पक्ष उद्योजकांना देशाचे शत्रू मानतो. जे उद्योगपती त्यांना पैसे देत नाहीत, त्यांच्यावर ते हल्ला करतात, म्हणजेच काँग्रेस आणि झामुमोसारख्या पक्षांना देशातील उद्योगांची चिंता नाही. त्यांचे नेते असे उघडपणे सांगतात. ते त्यांच्या भ्रष्टाचार आणि खंडणीशी संबंधित आहेत. काँग्रेसचे राजपुत्र उद्योग, उद्योगपती आणि गुंतवणुकीला रोज विरोध करतात. असे असताना येत्या काळात कोणता उद्योगपती त्यांच्या राज्यात जाऊन भांडवल गुंतवणार आहे? त्या राज्यातील तरुणांचे काय होणार?" असा सवालही मोदींनी केला.

Comments
Add Comment

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

रेल्वेचा नवीन नियम लागू; आता खिडकीवर तिकीट खरेदी करताना सुद्धा लागणार 'ओटीपी'

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या