Horoscope : दोन दिवसांत 'या' राशीत येणार राजयोग; होणार धनलाभ!

  43

पाहा तुमची रास आहे का यात?


मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, दोन दिवसांनंतर अत्यंत शुभ राजयोगाची निर्मिती होणार आहे. १९ मे रोजी शुक्र ग्रहाचं संक्रमण असणारी रास म्हणजेच वृषभ राशीत (Taurus) प्रवेश करणार आहे. हा राजयोग ज्योतिष शास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो. या राजयोगामुळे ४ राशींच्या लोकांना लाभ मिळणार आहे. या लोकांच्या नोकरीत पदोन्नती होऊ शकते. तसेच, व्यवसायात बढती मिळू शकते. या राजयोगामुळे वृषभ राशीसह काही राशीतील लोकांच्या आयुष्यात सुगीचे दिवस येणार आहेत. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.



मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी योग फारच शुभ परिणाम देणारा आहे. या राशीतील लोकांचा स्वभाव शांत असणार आहे. इतर लोक तुमच्या वागण्याने इम्प्रेस होऊ शकतात. तसेच, तुम्हाला धनलाभाचीही चांगली संधी मिळणार आहे. तुमचा व्यवहार सुरळीत चालेल. तसेच, बऱ्याच दिवसांपासून अडकलेले तुमचे पैसे देखील तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गासाठी हा काळ चांगला आहे. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.



वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीत गुरु आणि शुक्र यांच्या युतीने गजलक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. या दरम्यान तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्याची पुरेपूर शक्यता आहे. तसेच अविवाहितांसाठी हा काळ शुभ असणार आहे.



मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांना प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे. तसेच, अनपेक्षित धनलाभही होऊ शकतो. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं मार्गदर्शन मिळू शकतं. ज्यामुळे तुम्हाला खूप लाभ मिळेल.



कुंभ रास (Aquarius Horoscope)


गजलक्ष्मी राजयोगाने कुंभ राशीच्या लोकांनाही याचा लाभ मिळणार आहे. या राशीतील लोकांच्या जीवनात सुख-समृद्धीत, धन-संपत्तीत वाढ होईल. तसेच, मिळालेले पैसेही तुम्ही योग्य ठिकाणी खर्च कराल. या दरम्यान तुम्ही वाहन खरेदी करू शकता. तसेच, तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.


(टीप- वरील सर्व माहिती ज्योतिषतज्ञांकडून दिलेली आहे. 'प्रहार' या गोष्टींची कोणतीही पुष्टी करत नाही.)

Comments
Add Comment

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिकांचा रंग हवा पांढरा

अन्य रंगांच्या पत्रिका असल्यास त्वरीत बदलाव्या लागणार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यरत कर्मचारी

कुठल्या तोंडाने आंदोलन करता, शासनाचे दोन्ही जीआर रद्द; फडणवीसांची घोषणा

मुंबई : राज्यात हिंदी भाषेला विरुध्द करण्यासाठी राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर

मनोज जरांगेंची २९ ऑगस्टला 'चलो मुंबई'ची हाक

मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळण्याचा निर्धार जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या

दोन लाखांच्या बनावट नोटासह तिघे जेरबंद ; राहुरी पोलिसांची कारवाई

राहुरी : राहुरी पोलिसांच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री शहराच्या हद्दीत मोठी कारवाई करत दोन लाख रुपयांच्या २०० व

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी

Jagannath Yatra Stampede: डीएम-एसपींची बदली, दोन अधिकारी निलंबित...चेंगराचेंगरीत झालेल्या ३ मृत्यूंबाबत ओडिशा सरकारची मोठी कारवाई

ओडिशा: भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान पुरीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेत, ओडिशा सरकारने