Monsoon Trip : काही दिवसांवर येऊन ठेपला पावसाळा; 'या' ठिकाणी जायचा आत्ताच बेत आखा!

मुंबई : पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच आता निसर्गप्रेमींचे पावसाळी पिकनिकचे प्लॅन बनतील. महाराष्ट्रातील सुंदर डोंगररांगांमध्ये अशी अनेक मनमोहक ठिकाणे आहेत, जिथे पावसाळ्यात भेट देण्याचा आनंद वेगळाच असतो. म्हणूनच, आज तुम्हाला महाराष्ट्रातील अशा काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही मान्सूनचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.



१.लोणावळा / खंडाळा-पुणे :- मुंबई महामार्गावर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर हे थंड हवेचं ठिकाण आहे. इथे असलेली हिरवीगार वन्य शोभा,डोंगरमाथे, दऱ्या, पावसाळ्यात डोंगरातून वाहणारे धबधबे हे मनाला मोहून टाकणारे आहेत. पावसाळ्यात इथले सौंदर्य बहरून जाते.



२.ताम्हिणी घाट :- गोवा महामार्गावर मुंबईपासून सुमारे १४० किमी अंतरावर असणारे हे ताम्हिणी घाट पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे. हिरवेगार सौंदर्य,खोल दऱ्या,मुळशी धरण, डोंगरावरून पडणारे धबधबे हे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. येथे जवळच ३० किमी च्या अंतरावर सिंहगड किल्ला देखील प्रेक्षणीय आहे.



३.माळशेज घाट :- पावसाळ्यात महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणांमध्ये माळशेज घाटाचा उल्लेख नक्कीच होतो. समुद्रसपाटीपासून ७ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेला माळशेज घाट पावसाळ्यात एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे आणि ट्रेकर्स प्रेमींमध्ये हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात माळशेज घाटात सर्वत्र हिरवळ असते. पावसाळ्यात येथील पर्वत ढगांनी झाकलेले असतात. थंड हवेच्या झुळूकांमध्ये अनेक ठिकाणी सुंदर धबधबेही पाहायला मिळतात.



४.पाचगणी :- पाचगणी हिल स्टेशन हे सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील पाच टेकड्यांनी वेढलेले अतिशय सुंदर आणि लोकप्रिय ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेने वेढलेले असल्याने पावसाळ्यात त्याचे सौंदर्य अगदी नयनरम्य असते. पाचगणी हिल स्टेशन विशेषतः पावसाळ्यात निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमींना आकर्षित करते.



५.इगतपुरी :- इगतपुरी तालुक्याला निसर्गाने भरभरून दान दिले आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून उंच असल्याने इथे वर्षभर आल्हाददायक वातावरण असते. भरपूर वनसंपदा आणि जलसंपदा असल्याने प्रत्येकाला निसर्ग अगदी जवळून अनुभवायला मिळतो. भातसा नदीचे पात्र, आर्थर लेक, कळसुबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर, धम्मगिरी विपश्यना केंद्र, गिरीसागर फॉल्स, कॅमल व्हॅली, त्रिनगलवाडी फोर्ट, थाल घाट, म्यानमार गेट, भावली डॅम, अशोका फॉल्स, घाटनदेवी माता मंदिर ही ठिकाणे इगतपुरीचे आकर्षण आहे.



६.भीमाशंकर :- पुण्यातील जिल्ह्यात असणारे भीमाशंकर हे घनदाट अभयारण्य समृध्द असे ठिकाण आहे. भीमा नदीचा उगमही याच अरण्यातून होतो. हे ठिकाण उंचावर असल्याने पावसाळ्यात अगदी डोळ्याचे पारणे फेडणारे सौंदर्य निसर्गाने इथे उधळलेले असते. येथील गुप्त भीमाशंकर, कोकणकडा, सितारामबाबा आश्रम, नागफणी इ. ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

Comments
Add Comment

Solapur News : सातारा जिल्ह्यातून परीक्षेसाठी सोलापुरात आलेली २२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

Chandrashekhar Bawankule : परप्रांतीयांच्या कोकणातील जमीन खरेदीची चौकशी

- विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समिती; बेकायदेशीर पद्धतीने खरेदी झालेल्या जमिनी सरकारजमा होणार मुंबई :

kharif pik vima : खरीप २०२६ पीक विम्यासाठी नवे नियम लागू; अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी या 5 गोष्टी जाणून घ्या

मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगाम २०२६ साठी पीक विमा योजनेत (Crop Insurance) काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यंदा पीक विमा (Pik Vima)

Jalgaon : जळगाव-इंदूर विमानसेवेच्या हालचालींना पुन्हा वेग; डीजीसीएकडे तिसऱ्यांदा प्रस्ताव, लवकरच उड्डाणाची शक्यता

Jalgaon : जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या जळगाव-इंदूर थेट विमानसेवेच्या

Narhari Zirwal : तुकाराम मुंडेंच्या कारवाईनंतर दूध संकलनात २५ टक्के घट

- मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली; विधानभवनात येणाऱ्या अन्नाचीही तपासणी होणार मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन

Mumbai News : मुंबईत दूध भेसळ प्रकरणावर FDA ची मोठी कारवाई; ४७० लिटर दूध जप्त करून नष्ट

मुंबई : मुंबईतील दहिसर परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दूध भेसळीविरोधात मोठी कारवाई करत भेसळयुक्त दूध जप्त केले