भावेश भिंडेला २६ मे पर्यंत कोठडी

  41

मुंबई : न्यायालयाने घाटकोपर होर्डिंग प्रकरणी भावेश भिंडेला २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. घाटकोपर होर्डिंग केसमध्ये भावेश भिंडेला मुंबई क्राइम ब्रँचने जोधपूरहून अटक केल्याची न्यायालयात माहिती दिली. या प्रकरणात मुंबईतील १६ नागरिकांना जीव गमवावा लागला असून अनेकजण जखमी झाले आहेत.


आरोपी भावेश भिंडे याच्याकडे दुर्घटनाग्रस्त होर्डिंगसोबतच इतर ३ ते ४ होर्डिंगची जबाबदारी होती. त्या प्रत्येक एका होर्डिंगचा खर्च ३ ते ४ कोटीचा असल्याची पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली. या प्रकरणात भावेशने होर्डिंगसाठी परवानग्या घेतल्या आहेत का? घेतल्या असतील तर त्याबाबत कुणाची मदत घेतली आहे? असे प्रश्न असून यातील आर्थिक व्यवहारही तपासणे गरजेचे असल्याचे सांगत पोलिसांनी आरोपीची कस्टडी मागितली. त्यानंतर न्यायालयने आरोपीला २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.


इगो मिडियाच्या डायरेक्टरपदी जानवी म्हात्रे या होत्या. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर २२ नोव्हेंबर २०२२ रोजी भावेश भिंडेची नियु्क्ती करण्यात आली असल्याचा आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला. या होर्डिंगचे वर्षाला ४ कोटी रुपये हे रेल्वे पोलिस आयुक्तलयाला दिले जात असल्याची आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात माहिती दिली.


घटनेच्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसामुळे वाऱ्याचा वेग हा ताशी ९६ किलोमीटर इतका होता. एरव्ही वाऱ्याचा वेग आहे ताशी ५० ते ६० किमी इतका असतो. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर