Weather Update : 'या' भागात आठवडाभर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा

तर मुंबईत 'असं' असेल वातावरण


मुंबई : एकीकडे लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा आणि दुसरीकडे अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) थैमान घातलं आहे. अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसामुळे मुंबईत टॉवर, होर्डिंग, पूल कोसळ्याच्या घटना घडल्या तर बंगळूरमध्ये चक्क २७०हून अधिक झाडं कोसळ्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत. राज्यात या अवकाळी पावसाने चांगलच रौद्र रुप दाखवलं आहे. अशातच हवामान खात्याने (Meteorological Department) बंगळूर शहराला सावधानतेचा इशारा दिला आहे.


उत्तर भारतात मे महिन्यातील कडाकाच्या उन्हानं नागरिकांची लाही-लाही होत आहे. पण दक्षिण भारतातील अनेक भागांत मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. भारतीय हवामान खात्यानं (IMD) कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये (Bengaluru) आज वादळ आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.



१६ ते २१ मेपर्यंत यलो अलर्ट


१६ मे ते २१ मे पर्यंत बंगळुरूमधील हवामान खूप ढगाळ असेल. तसेच, सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळण्याचीही शक्यता भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. आठवडाभर शहरात मुसळधारेचा अंदाज आहे. १६, १७ आणि १९ मे रोजी वातावरण ढगाळ असू शकतं. तसेच, अधूनमधून ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.



मुंबईतील परिस्थिती काय?


तीन दिवसांपूर्वी मुंबईत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला होता. या पावसानंतर मुंबईत तात्पुरता गारवा जाणवत होता. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील उकाडा प्रचंड वाढला आहे. आजदेखील ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.



जागतिक स्तरावरही तापमानात वाढ


जागतिक हवामान संघटनेच्या माहितीनुसार, गेल्या तीन दशकांमध्ये जगभरात उष्माघातामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक पंचमांश मृत्यू हे भारतात झाले आहेत. कोरड्या हवामानात आणि कमी-मध्यम उत्पन्न असलेल्या भागात सर्वाधिक मृत्यूदर असल्याचे निरीक्षण 'कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस' आणि नोआच्या मासिक अहवालात नोंदवण्यात आले आहे.


दरम्यान, हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार मान्सून १९ मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होऊ शकतो. त्यानंतर ३१ मेच्या आसपास नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यापुढील वातावरण पोषक असेल तर मान्सून ७ ते १० जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली: