Dry Day In Maharashtra : तळीरामांसाठी मोठी बातमी! मुंबईत सलग तीन दिवस 'ड्राय डे’

जाणून घ्या नेमकं काय आहे कारण?


मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) अखेरचा टप्पा चालू आहे. २० मे रोजी मुंबईत पाचव्या टप्प्यातील मतदान (Voting) होत आहे. या काळात प्रशासनाकडून (Administration) आचारसंहितेप्रमाणे (Code of Conduct) आणखी काही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. निवडणुकीच्या या टप्प्यात मुंबईसह प्रशासनाने सलग तीन दिवस ड्राय-डे ची घोषणा केली आहे. या काळात मुंबईसह इतर परिसरातील सर्व दारुची दुकाने, आस्थापना बंद असणार आहेत. त्यामुळे काही दिवस मद्यप्रेमींच्या घशाला कोरड पडणार आहे.



महाराष्ट्रात तीन दिवस ‘ड्राय डे’


सोमवार २० मे रोजी मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार ते पुढील आठवड्यात सोमवारपर्यंत दारूची दुकाने आणि बार बंद राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई, पालघर, कल्याण आणि ठाणे या महाराष्ट्रातील प्रमुख मतदार संघांमध्ये २० मे रोजी मतदान होणार असल्यामुळे या मतदारसंघांमध्ये देखील ‘ड्राय डे’ पाळला जाणार आहे.


भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्देशानुसार, ज्या मतदारसंघात निवडणूक होणार आहे आणि नजीकच्या मतदारसंघांनी ‘ड्राय डे’ पाळणे आवश्यक आहे.



या दिवशी दारूची दुकाने बंद राहणार


मुंबई शहरात १८ मे रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून दारूची दुकाने आणि बार बंद असणार आहेत. त्यानंतर, १९ मे रोजी दिवसभर बंद राहतील आणि २० मे रोजी सायंकाळी ५ नंतर उघडतील. तसेच ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या वेळी मुंबईत पुन्हा ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.