Mahavikas Aghadi : चेंबूरमध्ये ठाकरे गटाच्या अनिल देसाईंची काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली हकालपट्टी!

मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर


मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जाहीर झाल्यापासून मविआतील (Mahavikas Aghadi) धुसफूस कायम बाहेर येत राहिली आहे. त्यातच आता मतदान शेवटच्या टप्प्यात पोहोचलं असतानाही मविआत मतभेद असल्याचं दिसून येत आहे. मविआमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे (Thackeray Group) उमेदवार अनिल देसाई (Anil Desai) चेंबूर पांजर पोळ परीसरात प्रचारासाठी आले असताना स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला आणि बाचाबाची करत त्यांना निघून जाण्यास सांगितले.


ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई हे ठिकठिकाणी सभा आणि बैठका घेत आहेत. चेंबूरमधील पांजर पोळ या ठिकाणी ते गेले असता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि अनिल देसाईंच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला. अनिल देसाईंनी या ठिकाणाहून निघून जावं, त्यांनी या ठिकाणी प्रचाराला येऊ नये अशी स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी केली. त्यानंतर दोन्ही गटामध्ये काहीवेळ बाचाबाची झाली.


हा नेमका वाद काय किंवा अनिल देसाईंनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध का केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र शिवसेना आणि काँग्रेसमध्ये हा वाद जुना असून त्यातूनच ही घटना घडल्याचं सांगितलं जातंय. निवडणुकीला आता अवघे चारच दिवस राहिले असताना काँग्रेस आणि ठाकरे गटातील हा वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून काय पावलं उचलली जातात हे पाहावं लागेल.


Comments
Add Comment

NEET-UG 2026 Result : नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर; परीक्षेत मुलींनी मारली बाजी

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA) ने नीट-यूजी (NEET-UG) २०२६ परीक्षेचा निकाल (Result) जाहीर केला आहे. उत्तरतालिका (Answer

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील