Weather updaes : मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता! राज्यात इतर ठिकाणी कशी असणार परिस्थिती?

हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज


मुंबई : मुंबईसोबतच नवी मुंबई, बदलापूर, कल्याण, पालघर, नाशिक परिसरात काल पडलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हाहाकार माजवला. यामध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जणांना जीवही गमवावा लागला. घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिग (Ghatkopar hoarding news) कोसळले तर वडाळा येथे पार्किंग लॉट कोसळल्याने प्रचंड नुकसान व जीवितहानी झाली. यानंतर आज मुंबई व राज्यात इतर ठिकाणी कशी परिस्थिती असेल, याविषयी हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने (Mumbai Center of Meteorological Department) अंदाज वर्तवला आहे. मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईत पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही मुंबईत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. या सर्व भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नारिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.



मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा अंदाज


मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह (४०-५० किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील