Salman Khan House firing : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात सहावा आरोपी ताब्यात!

मुंबई पोलिसांचे तपासयंत्र वेगाने सुरु


मुंबई : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर १४ एप्रिल रोजी अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. यानंतर मुंबई पोलिसांनी हरियाणातील (Hariyana) फतेहाबाद येथून आणखी एकाला अटक केली आहे. हा सहावा आरोपी आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली होती. त्यानंतर आज हरियाणामध्ये ही कारवाई करण्यात आली.


हरपाल सिंग (Harpal Singh) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो ३७ वर्षांचा आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हरपाल सिंगने या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचव्या आरोपी मोहम्मद रफिक चौधरीला आर्थिक मदत केली होती आणि रेकी करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. आरोपीला आज विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.



आठवडाभरापूर्वी राजस्थानमधून पाचव्या आरोपीला अटक


मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ७ मे रोजी राजस्थानमधून पाचव्या आरोपीला अटक केली होती. राजस्थानमधून अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद रफिक चौधरी असे आहे. चौधरी याने या प्रकरणात अटक केलेल्या सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन शूटर्सना पैसे आणि रेकी करण्यासाठी मदत केली होती.


सलमान खानच्या घराजवळ १४ एप्रिल रोजी गोळीबार करण्यात आला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने हालचाली करत आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, यातील एका आरोपीने अनुज थापनने (Anuj Thapan) १ मे रोजी तुरुंगात आत्महत्या केली. सध्या या प्रकरणाचा आणखी तपास सुरु आहे. हरपाल सिंगकडून आणखी काय खुलासे होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Comments
Add Comment

गेटवे परिसरातील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक; हरित आणि इंधन बचतीसाठी राज्य सरकारचा पुढाकार

इलेक्ट्रिक बोटींसाठी मुंबई बँकेने विशेष कर्ज योजना आणावी - मंत्री नितेश राणे इलेक्ट्रिक बोटिंसाठी मुंबई बँक

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Water Shortage : राज्यातील १५ जिल्ह्यांत पाणीटंचाई

६३३ गावे, १ हजार ६५२ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू मुंबई : राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे

महाराष्ट्रात होणार २५ हजार ४०० मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती

६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक; १ लाख २३ हजार ५०० नोकऱ्या उपलब्ध होणार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

ॲमिटी विद्यापीठाला पनवेलमध्ये १५ एकर जमीन; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : ॲमिटी विद्यापीठाची मूळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण

Tushar Gaikwad : खासदार वर्षा गायकवाड यांचे बंधू तुषार गायकवाड यांचे निधन

मुंबई : उत्तर-मध्य मुंबईच्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे धाकटे बंधू तुषार एकनाथ गायकवाड (Tushar Gaikwad) यांचे