Weather updates : नाशिक, पालघर, ठाण्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात!

वांगणी, बदलापूर, कल्याणमध्येही पाऊस; वाऱ्यांचा वेग ताशी १०७ किमी


मुंबईतही जोरदार पाऊस


ठाणे : मे महिना आणि उकाडा हे समीकरण असताना यंदा मात्र मे महिन्यातच वरुणराजाने बरसायला सुरुवात केली आहे. अगदी कालपर्यंत प्रचंड गरमी जाणवत असतानाच आज मात्र वांगणी, बदलापूर, कल्याणमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिक, पालघर, ठाण्यातही पाऊस पडत आहे. यामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. या ठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी १०७ किमी आहे.


पुणे, सातारा घाटमाथ्यावर देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घाटमाथ्यावरच्या परिसरात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, गारपीट आणि सोसाट्याचा वारा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही तास साधारणपणे ५० ते ६० किमी प्रतितास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील तीन ते चार दिवस संपूर्ण राज्यभरात अशीच परिस्थिती राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



मुंबईतही जोरदार पाऊस


मुंबईतही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. वांद्रे परिसरात जोरदार पाऊस पडत असून सोसाट्याचा वारा वाहत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी बांधकाम सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर धूळ देखील वातावरणात पसरली आहे.

Comments
Add Comment

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण

Uday Samant : पाषाण तलाव सांडपाणी प्रकल्पातील त्रुटींची होणार चौकशी!

१५ दिवसांत केंद्र सुरू न केल्यास पिंपरी-चिंचवडमधील इतर सोसायट्यांचेही नळ कनेक्शन कापणार - मंत्री उदय

Pratap Sarnaik : HSRP नंबर प्लेटची मुदत आज संपणार; परिवहन विभाग आणि ट्रॅफिक पोलीस करणार संयुक्त कारवाई

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हाय-सिक्युरिटी प्लेट बंधनकारक; एजंटच्या आमिषाला बळी न पडण्याचे परिवहन मंत्री