Lok Sabha Election 2024: १० राज्ये, ९६ मतदारसंघ, चौथ्या टप्प्यासाठीच्या मतदानाला सुरूवात

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४साठीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. चौथ्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून ९६ जागांवर आज मतदान होत आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार चौथ्या टप्प्यात एकूण १७.७ कोटी मतदार आणि१.९२ लाख मतदान केंद्र आहेत.


या टप्प्यात लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशातील १७५ आणि ओडिशाच्या २८ विधानसभेच्या जागांवरही मतदान होत आहे. यासोबतच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तेलंगणामध्ये मतदानाची वेळ वाढवण्यात आली आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून १७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १९ लाख मतदान अधिकारी १.९२ लाख मतदान केंद्रांवर १७.७ कोटीहून अधिक मतदारांचे स्वागत करतील. या टप्प्यात ८.९७ कोटी पुरूष आणि ८.७३ कोटी महिला मतदार आहेत.


निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील ११, महाराष्ट्रातील ११, मध्य प्रदेशातील आणि पश्चिम बंगालीमधील प्रत्येकी ८, बिहारमधील ५, ओडिशा आणि झारखंडमधील प्रत्येकी ४, जम्मू-काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.



राज्यातील या मतदारसंघात आज मतदान


पुणे
बीड
शिरूर
छत्रपती संभाजीनगर
जालना
अहमदनगर
मावळ
शिर्डी
रावेर

Comments
Add Comment

Chief Minister of Keral : अखेर सस्पेन्स संपला ! केरळमचे मुख्यमंत्री ठरले

Chief Minister of Keral : केरळमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, काँग्रेसने (Congress ) व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची

Delhi Bus Rape Case : दिल्ली हादरली! स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार

दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चेत आली आहे. राजधानीत एका खासगी

Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री; सोनं-चांदी ते दूधाच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांत देशाच्या आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात झपाट्याने घडामोडी घडताना दिसत आहेत.

Maharashtra ATS Launches Massive Crackdown : ATS चा धडाका! पाकिस्तानस्थित 'भट्टी गँग'चे जाळे उखडून फेकले; महाराष्ट्रात ४० ठिकाणी छापे, ५७ जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) बुधवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण राज्यात एक मोठी शोधमोहीम राबवली.

Uttar Pradesh Storm : उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून ५६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध जिल्ह्यांना बुधवारी भीषण वादळ आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. या

Monsoon Rain Update : उकाड्यापासून लवकरच सुटका! अंदमानात पुढच्या ४८ तासांत पावसाच्या सरी कोसळणार!

देशभरात उन्हाचा चटका वाढत असतानाच भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) एक दिलासादायक बातमी दिली आहे. नैऋत्य