Lok Sabha Election 2024: १० राज्ये, ९६ मतदारसंघ, चौथ्या टप्प्यासाठीच्या मतदानाला सुरूवात

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४साठीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. चौथ्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून ९६ जागांवर आज मतदान होत आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार चौथ्या टप्प्यात एकूण १७.७ कोटी मतदार आणि१.९२ लाख मतदान केंद्र आहेत.


या टप्प्यात लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशातील १७५ आणि ओडिशाच्या २८ विधानसभेच्या जागांवरही मतदान होत आहे. यासोबतच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तेलंगणामध्ये मतदानाची वेळ वाढवण्यात आली आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून १७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १९ लाख मतदान अधिकारी १.९२ लाख मतदान केंद्रांवर १७.७ कोटीहून अधिक मतदारांचे स्वागत करतील. या टप्प्यात ८.९७ कोटी पुरूष आणि ८.७३ कोटी महिला मतदार आहेत.


निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील ११, महाराष्ट्रातील ११, मध्य प्रदेशातील आणि पश्चिम बंगालीमधील प्रत्येकी ८, बिहारमधील ५, ओडिशा आणि झारखंडमधील प्रत्येकी ४, जम्मू-काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.



राज्यातील या मतदारसंघात आज मतदान


पुणे
बीड
शिरूर
छत्रपती संभाजीनगर
जालना
अहमदनगर
मावळ
शिर्डी
रावेर

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने