Lok Sabha Election 2024: १० राज्ये, ९६ मतदारसंघ, चौथ्या टप्प्यासाठीच्या मतदानाला सुरूवात

  71

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४साठीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. चौथ्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून ९६ जागांवर आज मतदान होत आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार चौथ्या टप्प्यात एकूण १७.७ कोटी मतदार आणि१.९२ लाख मतदान केंद्र आहेत.


या टप्प्यात लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशातील १७५ आणि ओडिशाच्या २८ विधानसभेच्या जागांवरही मतदान होत आहे. यासोबतच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तेलंगणामध्ये मतदानाची वेळ वाढवण्यात आली आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून १७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १९ लाख मतदान अधिकारी १.९२ लाख मतदान केंद्रांवर १७.७ कोटीहून अधिक मतदारांचे स्वागत करतील. या टप्प्यात ८.९७ कोटी पुरूष आणि ८.७३ कोटी महिला मतदार आहेत.


निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील ११, महाराष्ट्रातील ११, मध्य प्रदेशातील आणि पश्चिम बंगालीमधील प्रत्येकी ८, बिहारमधील ५, ओडिशा आणि झारखंडमधील प्रत्येकी ४, जम्मू-काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.



राज्यातील या मतदारसंघात आज मतदान


पुणे
बीड
शिरूर
छत्रपती संभाजीनगर
जालना
अहमदनगर
मावळ
शिर्डी
रावेर

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )