Income Tax : करदात्यांसाठी आनंदाची बातमी! आयकर विभागाने सुरु केली 'ही' नवी सुविधा

मुंबई : नवे आर्थिक वर्ष सुरु होताच अनेक बँकांकडून तसेच विभागाकडून अनेक नियमांमध्ये बदल केले जात होते. सध्या आयकर विभागाकडून (Income Tax) करदात्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट दिला आहे. आयकर विभागाने आयटीआर दाखल करताना करदात्यांना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी एक नवी सुविधा चालू केली आहे. आता करदात्याला विभागाने पाठवलेल्या नोटीस किंवा किती कर भरायचा राहिला या सगळ्या गोष्टी पाहणे सोयीस्कर होणार आहेत.जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.


मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने आता आपल्या करदात्यांसाठी अधिकृत नोटीस जारी केल्या आहेत. विभागाने ई-फायलिंग पोर्टलवर एक नवीन फीचर सुरू केले आहे ज्याचा फायदा करदात्यांना जारी केलेल्या नोटिस, पत्र आणि सूचनांचा मागोवा घेण्यास मदत करेल. यावर क्लिक करून, करदात्याला सर्व प्रलंबित कर नोटिसा एकाच ठिकाणी ट्रॅक करणे सोपे होणार आहे. प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या या सुविधेमुळे करदात्यांची मोठी सोय होणार असून आता त्यांना आयकर कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.



अशी आहे प्रक्रिया


करदात्यांना ई-फायलिंग पोर्टलवर जावे लागेल. आता तुम्हाला लॉग इन करावे लागेल. आता डॅशबोर्डवरून तुम्ही 'पेंडिंग ॲक्शन्स' विभागात जाऊ शकता आणि येथून 'ई-प्रोसिडिंग्स' वर जाऊ शकता. या फीचरमुळे करदात्यांचा वेळ वाचणार असून नोटीसला उत्तर देणेही सोपे होणार आहे.



नवीन टॅबमध्ये 'ही' माहिती मिळेल



  • कलम १३९(९) अंतर्गत सदोष सूचना

  • कलम २४५ अंतर्गत अधिसूचना

  • कलम १४३(१)(अ) अंतर्गत प्रथमदर्शनी समायोजन

  • कलम १५४ अंतर्गत सुओ मोटो सुधारणा

  • इतर कोणत्याही आयकर प्राधिकरणाने जारी केलेली नोटीस

  • स्पष्टीकरणासाठी मागितलेली माहिती

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव