Income Tax : करदात्यांसाठी आनंदाची बातमी! आयकर विभागाने सुरु केली 'ही' नवी सुविधा

मुंबई : नवे आर्थिक वर्ष सुरु होताच अनेक बँकांकडून तसेच विभागाकडून अनेक नियमांमध्ये बदल केले जात होते. सध्या आयकर विभागाकडून (Income Tax) करदात्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट दिला आहे. आयकर विभागाने आयटीआर दाखल करताना करदात्यांना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी एक नवी सुविधा चालू केली आहे. आता करदात्याला विभागाने पाठवलेल्या नोटीस किंवा किती कर भरायचा राहिला या सगळ्या गोष्टी पाहणे सोयीस्कर होणार आहेत.जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.


मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने आता आपल्या करदात्यांसाठी अधिकृत नोटीस जारी केल्या आहेत. विभागाने ई-फायलिंग पोर्टलवर एक नवीन फीचर सुरू केले आहे ज्याचा फायदा करदात्यांना जारी केलेल्या नोटिस, पत्र आणि सूचनांचा मागोवा घेण्यास मदत करेल. यावर क्लिक करून, करदात्याला सर्व प्रलंबित कर नोटिसा एकाच ठिकाणी ट्रॅक करणे सोपे होणार आहे. प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या या सुविधेमुळे करदात्यांची मोठी सोय होणार असून आता त्यांना आयकर कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.



अशी आहे प्रक्रिया


करदात्यांना ई-फायलिंग पोर्टलवर जावे लागेल. आता तुम्हाला लॉग इन करावे लागेल. आता डॅशबोर्डवरून तुम्ही 'पेंडिंग ॲक्शन्स' विभागात जाऊ शकता आणि येथून 'ई-प्रोसिडिंग्स' वर जाऊ शकता. या फीचरमुळे करदात्यांचा वेळ वाचणार असून नोटीसला उत्तर देणेही सोपे होणार आहे.



नवीन टॅबमध्ये 'ही' माहिती मिळेल



  • कलम १३९(९) अंतर्गत सदोष सूचना

  • कलम २४५ अंतर्गत अधिसूचना

  • कलम १४३(१)(अ) अंतर्गत प्रथमदर्शनी समायोजन

  • कलम १५४ अंतर्गत सुओ मोटो सुधारणा

  • इतर कोणत्याही आयकर प्राधिकरणाने जारी केलेली नोटीस

  • स्पष्टीकरणासाठी मागितलेली माहिती

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही