२० रूपयांच्या चिप्सच्या पॅकेटमध्ये किती तेल असते, उत्तर ऐकून खाणे सोडाल

  102

मुंबई: बाजारात विकली जाणारी चिप्सची पाकिटे बाहेरून दिसायला जितकी रंगीबेरंगी असतात तितकीच ती आरोग्यासाठी धोकादायक असतात. त्यातील स्वादिष्ट आणि कुरकुरीत चिप्स आरोग्यासाठी अतिशय घातक असतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की या एका चिप्सच्या पॅकेटमध्ये किती तेल असते आणि ते आरोग्यासाठी किती हानिकारक आहे.



चिप्सच्या पॅकेटमध्ये किती तेल असते?


एका चिप्सच्या पॅकेटचे वजन ५० ग्रॅम असते. यात साधारण १२ ते १३ टक्के तेल असते. तर काही चिप्सच्या पॅकेटमध्ये तेलाचे प्रमाण १५ टक्के असते. चिप्सच्या पॅकेटमध्ये आढळणारे हे तेल ट्रान्स फॅट्स असतात जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. स्पष्ट शब्दात सांगायचे तर हे चिप्स तुम्हाला गंभीर आजारी बनवू शकतात.



किती धोकादायक असतात ट्रान्स फॅट्स


नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार जगातील ५ अब्ज लोकांचे जीवन ट्रान्स फॅटने घटवले आहे. आता ते लोक हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त आहेत. चिप्सच्या पॅकेटमध्ये वापरले जाणारे तेल हे ट्रान्स फॅट असते. म्हणजे तुम्ही जितक्या वेळे चिप्स खाता तितक्या वेळा तुमचे आयुष्य संकटात टाकत आहात.


या चिप्सच्या पॅकेटमध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण हे प्रति शंभर ग्रॅममध्ये दोन ग्रॅमपेक्षा अधिक असता कामा नये. दरम्यान बाजारात उपलब्ध असणारे हे पदार्थ या नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे अशा पदार्थांपासून दूर राहिलेलेच बरे.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी