Health Tips : मुंबईकरांनो सावधान! अवकाळी पावसामुळे वाढला संसर्गाचा धोका

  101

'अशी' घ्या आरोग्याची काळजी


मुंबई : मे महिन्यातील उन्हाळ्याचे दिवस चालू असताना मुंबईत अचानक अवकाळी पाऊस बरसला आहे. त्यामुळे हवेत गारवा आला आहे. वातावरण सतत थंड, गरम होत आहे. अशा हवामानात झालेला हा बदल त्रासदायकही ठरु शकतो. पाऊस येतो तेव्हा अनेकांना आनंद वाटतो पण तो येताना सोबत अनेक आजार घेऊन येतो. हे आजार कोणते असतात? आणि आजारावेळी तब्येतीची कशी काळजी घ्यावी ते सविस्तर जाणून घ्या.




  • पावसाळ्यात जीवाणुंचे संक्रमण होऊन पोटात मुरडा येतो. पावसाळ्यात प्रदूषित पाणी आणि खाद्य पदार्थांचे सेवन केल्याने डायरियाला आपण आमंत्रण देतो.

  • प्रदूषित पाण्यामुळे हा आजार जडतो. स्वच्छ पाणी प्या. जेवण झाकून ठेवा. पाणी उकळून प्या. काहीही खाण्यापूर्वी हात धुवायला विसरु नका.

  • पावसाळ्यात फूड पॉयझनिंगचा धोका जास्त असतो. पोटात मुरडा, उल्टी होते. शरीरात कमजोरी जाणवते.

  • या आजारात शरिरात पाण्याची कमी जाणवते. कच्चे आणि स्वच्छ सलाड खा. रस्त्याशेजारी मिळणारे खाद्य अजिबात खाऊ नका. त्यासाठी दूषित पाणी वापरलं जाण्याची शक्यता असते.

  • तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. इम्युनिटी बूस्ट करणारे पदार्थ खा. तसेच घरच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. तब्येत ठिक नसेल तर आराम करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या.



Comments
Add Comment

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

बारीक लोकांनी बॉडीबिल्डिंग करताना चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ, नाहीतर...

मुंबई : आजकाल अनेक तरुणांना सुडौल आणि मजबूत शरीर (muscle building) बनवण्याची आवड आहे. यासाठी ते जिममध्ये

कच्चे, उकडलेले की ऑम्लेट? अंडे कसे खाणे ठरते फायदेशीर...घ्या जाणून

मुंबई: अंडी हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. अनेक लोक त्यांच्या आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश करतात. परंतु,

पोट साफ होत नसेल तर सकाळी करा हा उपाय...

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या बनली आहे. चुकीचा आहार, अपुरी झोप आणि बैठी

उपाशी पोटी खा ही ५ फळे, मिळतील अनेक फायदे

मुंबई : सकाळी उपाशी पोटी फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते

महिलांच्या आरोग्यासाठी 'हे' ५ आयुर्वेदिक सुपरफूड्स आहेत गुणकारी, रोजच्या आहारात करा समावेश

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक कामांची तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे त्यांच्या आरोग्याकडे