Nitesh Rane : इंडिया आघाडीला मत म्हणजे लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फ बोर्डच्या समर्थकांना मत!

काँग्रेस जिंकल्यास भारताच्या नाक्यानाक्यावर पाकिस्तानचे झेंडे दिसतील


हिंदू समाज उद्धव ठाकरेमुक्त करायचा आहे


भाजपा आमदार नितेश राणे यांचा घणाघात


मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना एक मुलाखत दिली. ही मुलाखत आज ठाकरे गटाचंच मुखपत्र असलेल्या 'सामना' (Saamana) वर्तमानपत्रात छापून आली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी 'भाजपमुक्त राम पाहिजे' अशी टीका केली. यावर भाजपा प्रवक्ते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार टीका केली आहे. यासोबतच त्यांनी पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या इंडिया आघाडी (INDIA Alliance) आणि मविआवर (Mahavikas Aghadi) घणाघात केला आहे. 'इंडिया आघाडीला मत म्हणजे लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फ बोर्डच्या समर्थकांना मत, त्यामुळे विचार करुन मत द्या', असा सल्ला नितेश राणे यांनी दिला.


नितेश राणे म्हणाले, इंडिया अलायन्सच्या नावाने आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नावाने मुस्लीम लीगची भाषा करणारे, मुस्लीम लीगची हिरवी पिल्लावळ म्हणून महाराष्ट्रात वळवळ करणारे हे लोक आहेत. उद्या जर आपण इंडिया अलायन्सला आपण मत दिलं तर आपल्याला भारताच्या नाक्यानाक्यावर पाकिस्तानचे झेंडे दिसतील. जिथे आपण आज रामभक्त म्हणून दुकानाबाहेर किंवा घराबाहेर भगवे झेंडे फडकवतोय, त्याचीही परवानगी आपल्याला भारतामध्ये राहून मिळणार नाही. कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर काय झालंय ते पाहा, अशी टीका नितेश राणे यांनी केली.


पुढे ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात कोरोनाच्या नावाने जसं सगळ्या सणासुदींवर बंदी घातली होती आणि दुसर्‍या बाजूला मोहरम आणि ईदच्या जोरदार मिरवणुका निघत होत्या तीच परिस्थिती उद्या इंडिया अलायन्स आणि मविआची लोकं निवडून आल्यानंतर भारतात होणार. तुम्ही सार्वजनिक हिंदूंचे उत्सव सोडा, तुमच्या घरातील मंदिराची पूजा करण्याची परवानगी तरी तुम्हाला देतील का इथपासून प्रश्न निर्माण होतील.


इंडिया अलायन्सच्या नावाने जे काही मतदान होतंय, जे काही फतवे निघतायत, ते धर्माच्या आधारे निघतायत, राष्ट्रभक्तांसाठी निघत नाही आहेत. संजय राजाराम राऊत हा कार्टा जे सकाळी बोलत होता की राष्ट्रभक्तांसाठी फतवे निघत आहेत, त्या कार्ट्याला हे पण कळत नाही की धर्माच्या आधारे मुसलमान लोकांनी फक्त इंडिया आघाडी आणि मविआला मतदान करावं कारण 'हमारा धर्म खतरे में है', याला राष्ट्रभक्ती म्हणत नाहीत. म्हणून इंडिया आघाडी आणि मविआला मत म्हणजे लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फ बोर्डच्या समर्थकांना मत, असं नितेश राणे म्हणाले.



हिंदू समाज उद्धव ठाकरेमुक्त करायचा आहे


ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे म्हणाले की राम मंदिर आम्हाला भाजपमुक्त करायचं आहे त्याप्रमाणे आम्हालाही हिंदू समाज उद्धव ठाकरेमुक्त करायचा आहे. कारण उद्धव ठाकरेची हिरवी टोळी जो हिंदू समाजाचा द्वेष करत आहे, त्या सगळ्याला नष्ट करण्याचं काम या देशाची जनता निश्चित पद्धतीने करेल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

महानगरपालिकेच्‍या शालेय विद्यार्थ्यांना नौकानयन क्रीडा प्रशिक्षण

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : जपानमधील नागोया येथे होणाऱ्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतातील

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेचा एकच गट?

स्वीकृत नगरसेवकांसह समित्यांमधील बदलणार समिकरणे मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये

राज्यातील 'त्रिभाषा सूत्रा'साठी समितीला मुदतवाढ

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये 'त्रिभाषा धोरण' निश्चित करण्यासाठी

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई - भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व