Jioचा सगळ्यात स्वस्त पोस्टपेड प्लान, मिळणार ५जी डेटा

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक प्लान्सचे पर्याय मिळतात. कंपनी प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकारचे प्लान्स ऑफर करत असते.

सगळ्यात स्वस्त प्लान


जर तुम्हाला जिओचा स्वस्त पोस्टपेड प्लान हवा असेल तर जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक पर्याय मिळतील. कंपनी २९९ रूपयांचा सर्वात स्वस्त प्लान ऑफर करते.

किती मिळणार डेटा


यात तुम्हाला अनलिमिटेड ५जी डेटा, व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही मिळते. हा प्लान ३० जीबी डेटासोबत येतो. रिचार्जच्या पूर्ण सायकलमध्ये तुम्हाला एकूण ३० जीबी डेटा मिळेल. डेटा लिमिट संपताच युजर्सला १० रूपये प्रति जीबी दराने डेटा मिळेल.

या रिचार्जमध्ये फॅमिली अॅड ऑनची सुविधा मिळत नाही. याशिवाय ग्राहकांना दररोज १०० एसएमएसही या प्लानसोबत भेटतील. रिचार्ज प्लान अनलिमिटेड ५जी डेटासह येतो. दरम्यान, यासाठी तुमच्याकडे ५जी फोन असणे गरजेचे आहे आणि तुमच्या भागामध्ये ५ जी नेटवर्क असणेही गरजेचे आहे.

जिओच्या २९९ रूपयांच्या प्लानमध्ये अतिरिक्त फायदेही मिळतात. कंपनी जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा फ्री अॅक्सेस देत आहे. लक्षात ठेवा की या प्लानसोबत तुम्हाला जिओ सिनेमाचा प्रीमियम अॅक्सेस मिळणार नाही. यासाठी तुम्हाला महिन्याला कमीत कमी २९ रूपये खर्च करावे लागतील.

जिओ सिनेमाचे तीन सबस्क्रिप्शन येतात. कंपनी २९ रूपये, ८९ रूपये आणि ९९९ रूपयांचे प्लान ऑफर करते. ९९९ रूपयांच्या या प्लानची व्हॅलिडिटी १ वर्ष असते.
Comments
Add Comment

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

शरद पवारांसाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाचा नकार

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला