Jioचा सगळ्यात स्वस्त पोस्टपेड प्लान, मिळणार ५जी डेटा

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक प्लान्सचे पर्याय मिळतात. कंपनी प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकारचे प्लान्स ऑफर करत असते.

सगळ्यात स्वस्त प्लान


जर तुम्हाला जिओचा स्वस्त पोस्टपेड प्लान हवा असेल तर जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक पर्याय मिळतील. कंपनी २९९ रूपयांचा सर्वात स्वस्त प्लान ऑफर करते.

किती मिळणार डेटा


यात तुम्हाला अनलिमिटेड ५जी डेटा, व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही मिळते. हा प्लान ३० जीबी डेटासोबत येतो. रिचार्जच्या पूर्ण सायकलमध्ये तुम्हाला एकूण ३० जीबी डेटा मिळेल. डेटा लिमिट संपताच युजर्सला १० रूपये प्रति जीबी दराने डेटा मिळेल.

या रिचार्जमध्ये फॅमिली अॅड ऑनची सुविधा मिळत नाही. याशिवाय ग्राहकांना दररोज १०० एसएमएसही या प्लानसोबत भेटतील. रिचार्ज प्लान अनलिमिटेड ५जी डेटासह येतो. दरम्यान, यासाठी तुमच्याकडे ५जी फोन असणे गरजेचे आहे आणि तुमच्या भागामध्ये ५ जी नेटवर्क असणेही गरजेचे आहे.

जिओच्या २९९ रूपयांच्या प्लानमध्ये अतिरिक्त फायदेही मिळतात. कंपनी जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा फ्री अॅक्सेस देत आहे. लक्षात ठेवा की या प्लानसोबत तुम्हाला जिओ सिनेमाचा प्रीमियम अॅक्सेस मिळणार नाही. यासाठी तुम्हाला महिन्याला कमीत कमी २९ रूपये खर्च करावे लागतील.

जिओ सिनेमाचे तीन सबस्क्रिप्शन येतात. कंपनी २९ रूपये, ८९ रूपये आणि ९९९ रूपयांचे प्लान ऑफर करते. ९९९ रूपयांच्या या प्लानची व्हॅलिडिटी १ वर्ष असते.
Comments
Add Comment

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

Bomb Threat : मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी; एका ईमेलमुळे खळबळ

- सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा