मुंबई: आजकाल खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अधिकतर लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका आढळून येतो. अनेकदा लोक बाहेर तळलेले मसाल्याचे पदार्थ खाणे पसंत करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का सतत बाहेरचे खाल्ल्याने तुमच्या हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतो. यासाठी तुम्हाला बाहेरचे खाणे कमी करून आपल्या डाएटमध्ये काही गोष्टी समाविष्ट कराव्या लागतील.
चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे कमी वयातच लोकांना अनेक आरोग्याच्या समस्या सतावू लागतात. यापासून बचाव करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करा. दररोज पालक, कोबी, मेथी, कोथिंबीर, सारख्या गोष्टींचे सेवन करा.
हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दररोज अक्रोडचे सेवन करा. अक्रोड हृदयासाठी फायदेशीर मानले जाते. यातील फायबर आणि मायक्रो न्यूट्रिएंट पुरेशा प्रमाणात असतात जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. सोबतच ब्लड प्रेशरही कंट्रोल करतात.
टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे हृदयासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
जर तुम्ही दररोज सकाळी नाश्त्यामध्ये ओट्स खात आहात तर त्याचे शरीराला जबरदस्त फायदे होतात. यामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…