Heart Attack: हृदयविकाराच्या धोक्यापासून वाचवतील या गोष्टी, दररोज खाल्ल्याने होणार फायदे

  56

मुंबई: आजकाल खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अधिकतर लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका आढळून येतो. अनेकदा लोक बाहेर तळलेले मसाल्याचे पदार्थ खाणे पसंत करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का सतत बाहेरचे खाल्ल्याने तुमच्या हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतो. यासाठी तुम्हाला बाहेरचे खाणे कमी करून आपल्या डाएटमध्ये काही गोष्टी समाविष्ट कराव्या लागतील.



या गोष्टींचे करा सेवन


चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे कमी वयातच लोकांना अनेक आरोग्याच्या समस्या सतावू लागतात. यापासून बचाव करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करा. दररोज पालक, कोबी, मेथी, कोथिंबीर, सारख्या गोष्टींचे सेवन करा.



हृदयासाठी अक्रोड


हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दररोज अक्रोडचे सेवन करा. अक्रोड हृदयासाठी फायदेशीर मानले जाते. यातील फायबर आणि मायक्रो न्यूट्रिएंट पुरेशा प्रमाणात असतात जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. सोबतच ब्लड प्रेशरही कंट्रोल करतात.



हृदयासाठी टोमॅटो


टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे हृदयासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.



नाश्त्यामध्ये ओट्सचे सेवन करा


जर तुम्ही दररोज सकाळी नाश्त्यामध्ये ओट्स खात आहात तर त्याचे शरीराला जबरदस्त फायदे होतात. यामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो.

Comments
Add Comment

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत