Heart Attack: हृदयविकाराच्या धोक्यापासून वाचवतील या गोष्टी, दररोज खाल्ल्याने होणार फायदे

मुंबई: आजकाल खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अधिकतर लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका आढळून येतो. अनेकदा लोक बाहेर तळलेले मसाल्याचे पदार्थ खाणे पसंत करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का सतत बाहेरचे खाल्ल्याने तुमच्या हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतो. यासाठी तुम्हाला बाहेरचे खाणे कमी करून आपल्या डाएटमध्ये काही गोष्टी समाविष्ट कराव्या लागतील.



या गोष्टींचे करा सेवन


चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे कमी वयातच लोकांना अनेक आरोग्याच्या समस्या सतावू लागतात. यापासून बचाव करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करा. दररोज पालक, कोबी, मेथी, कोथिंबीर, सारख्या गोष्टींचे सेवन करा.



हृदयासाठी अक्रोड


हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दररोज अक्रोडचे सेवन करा. अक्रोड हृदयासाठी फायदेशीर मानले जाते. यातील फायबर आणि मायक्रो न्यूट्रिएंट पुरेशा प्रमाणात असतात जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. सोबतच ब्लड प्रेशरही कंट्रोल करतात.



हृदयासाठी टोमॅटो


टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे हृदयासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.



नाश्त्यामध्ये ओट्सचे सेवन करा


जर तुम्ही दररोज सकाळी नाश्त्यामध्ये ओट्स खात आहात तर त्याचे शरीराला जबरदस्त फायदे होतात. यामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो.

Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी