Drinking Water: तुम्ही उभे राहून पाणी पिता का? तर हे जरूर वाचा

मुंबई: हल्ली लोक बाटलीतील पाणी पिण्याला पसंती देतात. उभ्या उभ्या बाटलीतील पाणी संपवता येते. मात्र असे करणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. आयुर्वेदात सांगितले आहे की उभे राहून कधीही गटागटा पाणी पिऊ नये. यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. पोटाच्या समस्या वाढू शकतात. तुम्हीही जर उभे राहून पाणी पित असाल तर सावधान. कारण यामुळे तुमच्या आरोग्यावर तुम्ही परिणाम करत आहात. यामुळे तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात.



ही आहे पाणी पिण्याची योग्य पद्धत


प्रत्येकाने पाणी ग्लासात घेऊन एका ठिकाणी बसून पाणी प्यायले पाहिजे. थोडे थोडे करून पाणी प्यायले पाहिजे. उभे राहून पाणी पिणे धोकादायक असते. आरामात पाणी पिणे योग्य असते. यामुळे शरीराच्या प्रत्येक भागाकडे पाणी पोहोचते.



उभे राहून पाणी पिण्याचे नुकसान


उभे राहून पाणी प्यायल्याने किडनीच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
फुफ्फुसांना त्रास होऊ शकतो.
पचनाचा त्रास संभवतो.
किडनीच्या रुग्णांनी उभे राहून पाणी पिऊ नये..



उभे राहून पाणी पिण्याचे साईडइफेक्ट


आयुर्वेदाच्या तज्ञानुसार उभे राहून पाणी प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास संभवू शकतो. जर बराच वेळ ही सवय असेल तर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. यामुळे आर्थरायटिस अथवा गाठीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. उभे राहून पाणी प्यायल्याने डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडू लागते.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात