Suresh Jain : ठाकरे गटाला दिलेल्या राजीनाम्यानंतर सुरेश जैन यांचा महायुतीला पाठिंबा!

भाजपात होणार सामील?


जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीत काल ठाकरे गटाला (Thackeray Group) पुन्हा एक मोठा धक्का मिळाला. ज्येष्ठ नेते सुरेश जैन (Suresh Jain) यांनी ठाकरे गटाला काल रामराम ठोकला. यानंतर ते थेट जळगावात दाखल झाले. मात्र, यानंतर कोणती भूमिका घेणार हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले होते. मतदानासाठी आपण जळगावात (Jalgaon) दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर अखेर त्यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. या निवडणुकीत त्यांनी महायुतीला (Mahayuti) पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे.


मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सुरेश जैन हे महायुतीला पाठिंबा देतील असे सूतोवाच केले होते. ते खरे ठरले असून विकासाच्या मुद्द्यावर आपण महायुतीसोबत असल्याचे जैन यांनी सांगितले. याआधी ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात सहभागी नसेन, असे म्हटले होते. ते म्हणाले होते की, मी सक्रिय राजकारणाचा संन्यास घेत आहे. वयोमानानुसार आणि प्रकृती अस्वाथ्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. या पुढे जे चांगलं काम करतील त्यांच्या पाठीशी राहणार, मात्र कोणत्याही पक्षात मी सहभागी नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आता त्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे.


सुरेश जैन म्हणाले, महायुतीने असं एकही क्षेत्र सोडलेलं नाही की जिथे त्यांच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी होत नाही. ते मला आवडत आहे आणि देशालाही त्याची आवश्यकता आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठी आणि हितासाठी ते काम करत असतील आणि या देशाला २०४७ पर्यंत तिसरी शक्ती बनवण्याचं स्वप्न बाळगत असतील, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण देशाला म्हणजेच शेतकरी असो, आदिवासी असो वा स्त्रिया त्यांना सशक्त बनवण्याची त्यांची जी भूमिका आहे, ती मला आवडली म्हणून मी हा पाठिंबा देत आहे, असं सुरेश जैन म्हणाले. मात्र, मी कोणत्याही पक्षात नसेन, चांगल्या भूमिकेला माझा पाठिंबा असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.



कार्यकर्त्यांसाठी मी कुठलाही मेळावा घेणार नाही


कार्यकर्त्यांसंदर्भात प्रश्न विचारला असता सुरेश जैन म्हणाले, मी एकेका कार्यकर्त्याला बोलावून माझी भूमिका सांगणार नाही. मी मेळावा घेणार नाही किंवा प्रचारही करणार नाही. प्रेस नोट अथवा मीडियाच्या माध्यमातून जो विचार कार्यकर्त्यांपर्यंत जाईल तो जाईल, असं सुरेश जैन म्हणाले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला

Pratap Sarnaik : 'एसटी'चा प्रवास महागणार?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत; ३१ मेपर्यंत वाट पाहण्याची भूमिका मुंबई : अमेरिका आणि इराणमधील

Chandrashekhar Bawankule : भर कार्यक्रमात महसूलमंत्र्यांना कागदाने वारा! अमरावतीच्या जनता दरबारातील 'तो' व्हिडिओ चर्चेत

अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका अनोख्या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. अमरावती जिल्ह्यातील