JP Nadda : भविष्यातही मोदी हेच नेतृत्व करणार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डांचे केजरीवालांना प्रत्युत्तर


नवी दिल्ली : “भारतीय जनता पक्षाच्या घटनेत कुठेही वयाची अशी तरतूद नाही. मोदीजींचा प्रत्येक कण आणि प्रत्येक क्षण भारतमातेच्या सेवेसाठी समर्पित आहे. हे जनतेलाही माहीत आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत’ची संकल्पना साकार होत असून, पुढील ५ वर्षांच्या कार्यकाळात मोदीजी देशाला नव्या उंचीवर नेतील. मोदीजीच आमचे नेते आहेत आणि भविष्यातही आमचे नेतृत्व करत राहतील, असे केजरीवालांच्या प्रश्नाला उत्तर देताना भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा (JP Nadda) यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.


दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पक्षाच्या नियमानुसार पंतप्रधान मोदींनंतर भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? असा सवाल भारतीय जनता पक्षाला केला आहे. केजरीवालांच्या या प्रश्नाला नड्डा यांनी ‘निवडून येतील तर मोदीच येतील, राहतील तर मोदीच आणि भारताला मजबूत देखील मोदीच बनवतील’, असे उत्तर दिले आहे.


निवडणुकीतील अपयश लक्षात आल्यानंतर केजरीवाल आणि संपूर्ण ‘इंडिया’ आघाडी अस्वस्थ आहे. देशाची दिशाभूल करणे आणि गोंधळ घालणे हा त्यांचा उद्देश आहे. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत मोदीजींना जनतेचे अतोनात आशीर्वाद मिळत आहेत. त्यांच्याकडे पंतप्रधान मोदींप्रमाणे कोणते धोरण नाही की, कोणता ठोस कार्यक्रम नाही. त्यामुळेच ते मोदीजींच्या वयाची सबब पुढे करून मार्ग काढत असल्याची टीका नड्डा यांनी केजरीवालांवर केली.

Comments
Add Comment

Indian Warships in Thailand : थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला