Delhi Capitals : ऋषभ पंतवर बीसीसीआयची निलंबनाची कारवाई! ३० लाखांचा दंडही ठोठावला

  71

दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; नेमकं प्रकरण काय?


नवी दिल्ली : क्रिकेटविश्वात सध्या आयपीएलची (IPL 2024) जोरदार हवा आहे. आयपीएलच्या १७ व्या हंगामात प्लेऑफचे तिकीट मिळवण्यासाठी अनेक संघांत चुरस सुरू आहे. मात्र, त्यातच दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला एक मोठा झटका देणारी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला (Rishabh Pant) एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. शिवाय त्याला ३० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.


दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील लढत ७ मे रोजी अरुण जेटली स्टेडियमवर झाली होती. या लढतीत दिल्लीला निर्धारीत वेळेत ओव्हर पूर्ण करता आल्या नाहीत. धीम्या गतीने ओव्हर टाकल्याबद्दल आयपीएलच्या आचारसंहितेनुसार दिल्लीकडून झालेली ही तिसरी चूक आहे. ज्यामुळे रिषभ पंतला ३० लाख रुपये दंड आणि एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले. इम्पॅक्ट प्लेअरसह प्लेइंग इलेव्हनच्या उर्वरित सदस्यांना प्रत्येकी १२ लाख किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या ५० टक्के, यापैकी जे कमी असेल तेवढा दंड ठोठावण्यात आला आहे.


आयपीएल आचारसंहितेच्या कलम ८ नुसार, दिल्ली कॅपिटल्सने मॅच रेफरीच्या निर्णयाला आव्हान देणारे अपील दाखल केले. यानंतर, अपील पुनरावलोकनासाठी BCCI लोकपाल समितीकडे पाठवण्यात आले. लोकपालने व्हर्च्युअल सुनावणी घेतली आणि मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील असे स्पष्ट केले. त्यामुळे ऋषभ पंत दिल्लीकडून पुढील सामना खेळू शकणार नाही. दिल्लीची पुढील मॅच १२ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध होणार आहे.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके