Delhi Capitals : ऋषभ पंतवर बीसीसीआयची निलंबनाची कारवाई! ३० लाखांचा दंडही ठोठावला

दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; नेमकं प्रकरण काय?


नवी दिल्ली : क्रिकेटविश्वात सध्या आयपीएलची (IPL 2024) जोरदार हवा आहे. आयपीएलच्या १७ व्या हंगामात प्लेऑफचे तिकीट मिळवण्यासाठी अनेक संघांत चुरस सुरू आहे. मात्र, त्यातच दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला एक मोठा झटका देणारी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला (Rishabh Pant) एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. शिवाय त्याला ३० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.


दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील लढत ७ मे रोजी अरुण जेटली स्टेडियमवर झाली होती. या लढतीत दिल्लीला निर्धारीत वेळेत ओव्हर पूर्ण करता आल्या नाहीत. धीम्या गतीने ओव्हर टाकल्याबद्दल आयपीएलच्या आचारसंहितेनुसार दिल्लीकडून झालेली ही तिसरी चूक आहे. ज्यामुळे रिषभ पंतला ३० लाख रुपये दंड आणि एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले. इम्पॅक्ट प्लेअरसह प्लेइंग इलेव्हनच्या उर्वरित सदस्यांना प्रत्येकी १२ लाख किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या ५० टक्के, यापैकी जे कमी असेल तेवढा दंड ठोठावण्यात आला आहे.


आयपीएल आचारसंहितेच्या कलम ८ नुसार, दिल्ली कॅपिटल्सने मॅच रेफरीच्या निर्णयाला आव्हान देणारे अपील दाखल केले. यानंतर, अपील पुनरावलोकनासाठी BCCI लोकपाल समितीकडे पाठवण्यात आले. लोकपालने व्हर्च्युअल सुनावणी घेतली आणि मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील असे स्पष्ट केले. त्यामुळे ऋषभ पंत दिल्लीकडून पुढील सामना खेळू शकणार नाही. दिल्लीची पुढील मॅच १२ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध होणार आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या