Weight loss: वजन घटवायचे आहे तर रात्री खाऊ नका हे ५ पदार्थ

  80

मुंबई: आजकालच्या युगात लठ्ठपणाने साऱ्यांनाच ग्रासले आहे. जो तो वाढत्या वजनाबाबत काळजीत दिसतो. खराब खाण्यापिण्याच्या सवयी आणि लाईफस्टाईल हेच याचे कारण आहे.


जर तुम्ही स्वत:वर लक्ष देत नसाल हा लठ्ठपणा वाढत जातो. यामुळे केवळ तुमची पर्सनॅलिटीच खराब होत नाही तर अनेक आजारांना निमंत्रण देते. मात्र जर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही लहान लहान सुधारणा केल्या तर तुम्ही लठ्ठपणा नियंत्रित करू शकता. तसेच फिटही राहू शकता.


येथे आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगत आहोत जे चुकूनह रात्रीच्या वेळेस खाऊ नये.


रात्रीच्या जेवणात अथवा झोपण्याच्या आधी तळलेले-भाजलेले पदार्थ खाऊ नयेत.


फॅटी फूड्सच्या सेवनाने तुमच्या शरीरात चरबी वाढते.जर तुम्ही रात्री हे खात असाल तर यामुळे लठ्ठपणा वाढतो.


मटणामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट आणि कॅलरीज असतात यामुळे रात्रीचे सेवन करू नये.


आईस्क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात फॅट आणि साखर असते त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर रात्रीच्या वेळेस आईस्क्रीम खाऊ नका.


फ्रोझन फूडमध्येही अनेक प्रकारचे प्रिझर्व्हेटिव असतात जे फॅट वाढवतात यामुळे याचे सेवन करू नये.

Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे