SRH vs LSG: हैदराबादचा धमाकेदार विजय, लखनऊला १० विकेटनी हरवले

  48

मुंबई: सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपरजायंट्सला १० विकेटनी हरवले आहे. लखनऊने पहिल्यांदा खेळताना १६५ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली होती. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी हैदराबादच्या फलंदाजांनी पूर्ण १० षटकेही घेतली नाहीत.


ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यात १६७ धावांची भागीदारी झाली. ट्रेविस हेडने ३० बॉलमध्ये ८९ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने ८ चौकार आणि ८ षटकार ठोकले. तर दुसरीकडे अभिषेक शर्माने २८ बॉलमध्ये ७५ धावा ठोकल्या. त्याने या खेळीत ८ चौकार आणि ६ षटकार ठोकले.


दोघांनी पहिल्या षटकापासूनच जोरदार फटकेबाजी करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे हैदराबादने ६५ चेंडू आणि १० विकेट राखत हे आव्हान सहज पेलले.


१६६ धावांचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी चौथ्याच ओव्हरमध्ये ५० धावांचा आकडा पार केला होता. त्यानतंर पॉवरप्ले संपेपर्यंत संघाने १०७ धावा केल्या होत्या एकीकडे ट्रेविस हेडनो १६ बॉलमध्ये ५० धावा तडकावल्या तर अभिषेक शर्माने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी १९ बॉल घेतले. त्यानंतर हेड आणि अभिषेक लखनऊच्या गोलंदाजांवर तुटून पडले. हैदराबदाने १० षटकेही पूर्ण केली नाहीत. यातील ७ षटक असे होते ज्यात त्यांनी १५ हून अधिक धावा केल्या.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी