SRH vs LSG: हैदराबादचा धमाकेदार विजय, लखनऊला १० विकेटनी हरवले

  57

मुंबई: सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपरजायंट्सला १० विकेटनी हरवले आहे. लखनऊने पहिल्यांदा खेळताना १६५ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली होती. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी हैदराबादच्या फलंदाजांनी पूर्ण १० षटकेही घेतली नाहीत.


ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यात १६७ धावांची भागीदारी झाली. ट्रेविस हेडने ३० बॉलमध्ये ८९ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने ८ चौकार आणि ८ षटकार ठोकले. तर दुसरीकडे अभिषेक शर्माने २८ बॉलमध्ये ७५ धावा ठोकल्या. त्याने या खेळीत ८ चौकार आणि ६ षटकार ठोकले.


दोघांनी पहिल्या षटकापासूनच जोरदार फटकेबाजी करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे हैदराबादने ६५ चेंडू आणि १० विकेट राखत हे आव्हान सहज पेलले.


१६६ धावांचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी चौथ्याच ओव्हरमध्ये ५० धावांचा आकडा पार केला होता. त्यानतंर पॉवरप्ले संपेपर्यंत संघाने १०७ धावा केल्या होत्या एकीकडे ट्रेविस हेडनो १६ बॉलमध्ये ५० धावा तडकावल्या तर अभिषेक शर्माने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी १९ बॉल घेतले. त्यानंतर हेड आणि अभिषेक लखनऊच्या गोलंदाजांवर तुटून पडले. हैदराबदाने १० षटकेही पूर्ण केली नाहीत. यातील ७ षटक असे होते ज्यात त्यांनी १५ हून अधिक धावा केल्या.

Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये