SRH vs LSG: हैदराबादचा धमाकेदार विजय, लखनऊला १० विकेटनी हरवले

मुंबई: सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपरजायंट्सला १० विकेटनी हरवले आहे. लखनऊने पहिल्यांदा खेळताना १६५ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली होती. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी हैदराबादच्या फलंदाजांनी पूर्ण १० षटकेही घेतली नाहीत.


ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यात १६७ धावांची भागीदारी झाली. ट्रेविस हेडने ३० बॉलमध्ये ८९ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने ८ चौकार आणि ८ षटकार ठोकले. तर दुसरीकडे अभिषेक शर्माने २८ बॉलमध्ये ७५ धावा ठोकल्या. त्याने या खेळीत ८ चौकार आणि ६ षटकार ठोकले.


दोघांनी पहिल्या षटकापासूनच जोरदार फटकेबाजी करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे हैदराबादने ६५ चेंडू आणि १० विकेट राखत हे आव्हान सहज पेलले.


१६६ धावांचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी चौथ्याच ओव्हरमध्ये ५० धावांचा आकडा पार केला होता. त्यानतंर पॉवरप्ले संपेपर्यंत संघाने १०७ धावा केल्या होत्या एकीकडे ट्रेविस हेडनो १६ बॉलमध्ये ५० धावा तडकावल्या तर अभिषेक शर्माने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी १९ बॉल घेतले. त्यानंतर हेड आणि अभिषेक लखनऊच्या गोलंदाजांवर तुटून पडले. हैदराबदाने १० षटकेही पूर्ण केली नाहीत. यातील ७ षटक असे होते ज्यात त्यांनी १५ हून अधिक धावा केल्या.

Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील