कमी पाणी प्यायल्यामुळे होऊ शकतो किडनीचा हा गंभीर आजार

  93

मुंबई: उन्हाळा असो वा थंडी प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीराच्या हिशेबाने भरपूर प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे. कारण आपले शरीर निरोगी ठेवण्यात पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. म्हणजेच पाणी आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करते. पाणीच्या कमतरतेमुळे केवळ आपले शरीर डिहायड्रेटच होत नाही तर किडनीमध्ये स्टोमची समस्याही निर्माण होते.



स्टोनचा त्रास असलेल्यांनी किती पाणी प्यावे?


किडनी स्टोनची समस्या आजकाल लोकांमध्ये वाढत चालली आहे. यामुळे अनेक जण या आजाराचे बळी ठरत आहेत. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसांत लोकांच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता होते यामुळे किडनीमध्ये स्टोनचा त्रास होऊ लागतो.



किडनीमध्ये स्टोन कधी होतात?


किडनी आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. यामुळे रक्त फिल्टर होण्याचे काम होते. किडनी खाण्यातून सोडियम, कॅल्शियम आणि इतर पोषकतत्वे गाळून रक्तातून खराब पदार्थ गाळून टॉयलेटच्या मार्गाने बाहेर काढण्याचे काम करते. मात्र शरीरात जेव्हा खनिजे आणि आयर्न मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा किडनी फिल्टर करू शकत नाही. अशा स्थितीत हे किडनीकडेच जमा होऊ लागते आणि तेथे स्टोन वाढायला लागतो.



कमी पाणी प्यायल्याने वाढतो किडनी स्टोनचा धोका


उन्हाळ्याच्या दिवसातून शरीरातून अधिक घाम निघत असतो. यामुळे शरीर डिहायड्रेट होते. तसेच शरीरात पाण्याची कमतरता भासते. डिहायड्रेशनच्या या स्थितीमध्ये किडनीमध्ये स्टोनचा त्रास अधिक वाढतो.या मोसमात कमी पाणी प्यायल्याने शरीरातील मीठ आणि खनिज पदार्थ क्रिस्टलचे रूप घेतात आणि स्टोन तयार होतो.



दिवसभरात किती पाणी प्यावे?


ज्यांच्या घरात कोणाला ना कोणाल किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी दिवसातून कमीत की २ ते ३ लीटर पाणी प्यावे. याशिवाय मीठ कमी खावे. तसेच चिकन आणि मटणही कमी खावे.

Comments
Add Comment

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी

Health: रात्री झोपण्याआधी खाऊ नका या गोष्टी...नाहीतर येणार नाही झोप

मुंबई: प्रत्येकाला वाटते की रात्रीची झोप ही शांत आणि गाढ असावी. मात्र अनेकदा आपण झोपेच्या आधी अशा गोष्टींचे सेवन