Team india: टी-२० वर्ल्डकपआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज

Share

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे काही खेळाडू टी-२० वर्ल्डकपची घोषणा झाल्यानंतर फ्लॉप झालेले दिसत होते. मात्र आता संघासाठी गुड न्यूज समोर आली आहे. संघातीने अनेक खेळाडूंनी फॉर्म मिळवला आहे. या यादीत आता मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवचे नावही सामील झाले आहे. सूर्याने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळवण्यात आलेल्या आयपीएल २०२४च्या ५५व्या सामन्यात शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

सूर्यकुमारने आव्हानाचा पाठलाग करताना ५१ बॉलमध्ये १२ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०२ धावा केल्या. हा मुंबईचा या हंगामातील चौथा विजय आहे. या विजयाने सूर्या फॉर्ममध्ये परतण्यासोबतच टीम इंडियालाही फायदा होईल. आयपीएलनंतर लगेचच जूनपासून टी-२० वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. जाणून घेऊया या की सूर्याआधी कोण कोणत्या खेळाडूंनी शतक ठोकत टीम इंडियाला गुड न्यूज दिली आहे.

सूर्यकुमार यादवच्या आधी टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात निवडला गेलेला विराट कोहली, यशस्वी जायसवाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी शतक ठोकले आहे. या खेळाडूंचे शतक टीम इंडियाला टी-२० वर्ल्डकप जिंकण्याच्या जवळ घेऊन जात आहे.

सूर्याने मुंबईला मिळवून दिला एकतर्फी विजय

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने २० षटकांत ८ बाद १७३ धावा केल्या होत्या. संघासाठी ट्रेविस हेडने सर्वात मोठी खेळी करत ३० बॉलमध्ये ४८ धावा केल्या. यात ७ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. हेडशिवाय हैदराबादचे बाकी फलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाहीत.

त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाछी उतरलेल्या मुंबई इंडियन्सने १७.२ षटकांत विजय आपल्या नावे केला. संघाला विजय मिळवून देण्यात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. मुंबईने ४.१ षटकांत ३१ धावा देत ३ विकेट गमावल्या होत्या. येथून सूर्यकुमार यादवने शतकी खेळी करण्यास सुरूवात केली. त्याला तिलक वर्मानेही चांगली साथ दिली. तिलक आणि सूर्याने चौथ्या विकेटसाठी नाबाद १४३ धावांची भागीदारी केली.

Recent Posts

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

3 minutes ago

अधिकाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास होणार निलंबनाची कारवाई

मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…

10 minutes ago

दहशतवादी हल्ल्याने महाराष्ट्रावर पसरली शोककळा

डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…

20 minutes ago

CT Scan मुळे कर्करोग होऊ शकतो का? अमेरिकेतील एका नवीन अभ्यासात खुलासा

CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…

25 minutes ago

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंचा अ‍ॅक्शन मोड! अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी जम्मू-काश्मीरकडे रवाना

मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…

51 minutes ago

NEET Student Suicide : ‘परीक्षा आणि कुटुंब जबाबदार नाहीत’ चिठ्ठी लिहित १८ वर्षीय विद्यार्थ्याने घेतला गळफास!

पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…

1 hour ago