Team india: टी-२० वर्ल्डकपआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे काही खेळाडू टी-२० वर्ल्डकपची घोषणा झाल्यानंतर फ्लॉप झालेले दिसत होते. मात्र आता संघासाठी गुड न्यूज समोर आली आहे. संघातीने अनेक खेळाडूंनी फॉर्म मिळवला आहे. या यादीत आता मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवचे नावही सामील झाले आहे. सूर्याने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळवण्यात आलेल्या आयपीएल २०२४च्या ५५व्या सामन्यात शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.


सूर्यकुमारने आव्हानाचा पाठलाग करताना ५१ बॉलमध्ये १२ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०२ धावा केल्या. हा मुंबईचा या हंगामातील चौथा विजय आहे. या विजयाने सूर्या फॉर्ममध्ये परतण्यासोबतच टीम इंडियालाही फायदा होईल. आयपीएलनंतर लगेचच जूनपासून टी-२० वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. जाणून घेऊया या की सूर्याआधी कोण कोणत्या खेळाडूंनी शतक ठोकत टीम इंडियाला गुड न्यूज दिली आहे.


सूर्यकुमार यादवच्या आधी टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात निवडला गेलेला विराट कोहली, यशस्वी जायसवाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी शतक ठोकले आहे. या खेळाडूंचे शतक टीम इंडियाला टी-२० वर्ल्डकप जिंकण्याच्या जवळ घेऊन जात आहे.



सूर्याने मुंबईला मिळवून दिला एकतर्फी विजय


मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने २० षटकांत ८ बाद १७३ धावा केल्या होत्या. संघासाठी ट्रेविस हेडने सर्वात मोठी खेळी करत ३० बॉलमध्ये ४८ धावा केल्या. यात ७ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. हेडशिवाय हैदराबादचे बाकी फलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाहीत.


त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाछी उतरलेल्या मुंबई इंडियन्सने १७.२ षटकांत विजय आपल्या नावे केला. संघाला विजय मिळवून देण्यात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. मुंबईने ४.१ षटकांत ३१ धावा देत ३ विकेट गमावल्या होत्या. येथून सूर्यकुमार यादवने शतकी खेळी करण्यास सुरूवात केली. त्याला तिलक वर्मानेही चांगली साथ दिली. तिलक आणि सूर्याने चौथ्या विकेटसाठी नाबाद १४३ धावांची भागीदारी केली.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए