Team india: टी-२० वर्ल्डकपआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे काही खेळाडू टी-२० वर्ल्डकपची घोषणा झाल्यानंतर फ्लॉप झालेले दिसत होते. मात्र आता संघासाठी गुड न्यूज समोर आली आहे. संघातीने अनेक खेळाडूंनी फॉर्म मिळवला आहे. या यादीत आता मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवचे नावही सामील झाले आहे. सूर्याने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळवण्यात आलेल्या आयपीएल २०२४च्या ५५व्या सामन्यात शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.


सूर्यकुमारने आव्हानाचा पाठलाग करताना ५१ बॉलमध्ये १२ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०२ धावा केल्या. हा मुंबईचा या हंगामातील चौथा विजय आहे. या विजयाने सूर्या फॉर्ममध्ये परतण्यासोबतच टीम इंडियालाही फायदा होईल. आयपीएलनंतर लगेचच जूनपासून टी-२० वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. जाणून घेऊया या की सूर्याआधी कोण कोणत्या खेळाडूंनी शतक ठोकत टीम इंडियाला गुड न्यूज दिली आहे.


सूर्यकुमार यादवच्या आधी टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात निवडला गेलेला विराट कोहली, यशस्वी जायसवाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी शतक ठोकले आहे. या खेळाडूंचे शतक टीम इंडियाला टी-२० वर्ल्डकप जिंकण्याच्या जवळ घेऊन जात आहे.



सूर्याने मुंबईला मिळवून दिला एकतर्फी विजय


मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने २० षटकांत ८ बाद १७३ धावा केल्या होत्या. संघासाठी ट्रेविस हेडने सर्वात मोठी खेळी करत ३० बॉलमध्ये ४८ धावा केल्या. यात ७ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. हेडशिवाय हैदराबादचे बाकी फलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाहीत.


त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाछी उतरलेल्या मुंबई इंडियन्सने १७.२ षटकांत विजय आपल्या नावे केला. संघाला विजय मिळवून देण्यात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. मुंबईने ४.१ षटकांत ३१ धावा देत ३ विकेट गमावल्या होत्या. येथून सूर्यकुमार यादवने शतकी खेळी करण्यास सुरूवात केली. त्याला तिलक वर्मानेही चांगली साथ दिली. तिलक आणि सूर्याने चौथ्या विकेटसाठी नाबाद १४३ धावांची भागीदारी केली.

Comments
Add Comment

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला.

बुमराहसमोर वेस्ट इंडिजचा हेटमायर हतबल

कोलकाता : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा निर्णायक सामना

द. आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर ५ गडी राखून विजय

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील सुपर आठ फेरीत दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा ५ गडी राखून पराभव केला. झिम्बाब्वेचा