रायगड लोकसभेत सर्वच आमदारांची प्रतिष्ठा पणाला

निवडणूक लोकसभेची मात्र, विधानसभेच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला


पेण(देवा पेरवी): रायगड लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान होणार आहे. निवडणूक लोकसभेची असली तरी या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील विधानसभेच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चार-सहा महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या लोकसभा निवडणुकीकडे पाहीले जात आहे. त्यामुळे सर्वच आमदारांनी मतांचा जोगवा आपल्या उमेदवारांच्या पदरात पाडण्यासाठी जोर लावला आहे.


रायगड लोकसभा मतदार संघात पेण, अलिबाग, महाड, श्रीवर्धन, दापोली आणि गुहागर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी गुहागर हा एकमेव विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे. तर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे भास्कर जाधव हे गुहागरचे आमदार आहेत. तर पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड आणि दापोली मध्ये महायुतीचे आमदार आहेत. पेण येथे भाजपचे आमदार रविंद्र पाटील, अलिबाग येथे शिवसेनेचे आमदार (शिंदे गट) महेंद्र दळवी, श्रीवर्धन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाकच्या ) आमदार आदिती तटकरे, महाड येथे शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार भरत गोगावले, आणि दापोलीतून शिवसेना (शिंदे गटाचे) योगेश कदम आमदार आहेत.


बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे जिल्ह्याचे राजकीय परिस्थिती 360 अंशाच्या कोनात फिरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. सहयोगी पक्षांशी जुळवून घेणे, नेते आणि कार्यकर्त्यांना अडचणीचे जात आहे. अशा वेळी नेते आणि कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीचे दाखले लोकसभा निवडणूकीच्या प्रचार करवून घेतला जात आहे. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने विधानसभा निवडणूकीचे तह केले जात आहेत.


शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने या दोन प्रमुख पक्षांची ताकद दोन गटात विभागली गेली आहे. त्यामुळे दोन्ही गटांना आपले अस्तित्व आणि मतदारसंघावरील ताकद दाखविण्याची संधी लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने चालून आली आहे. चार-सहा महिन्यांनंतर विधानसभेची निवडणूक होणार असल्याने लोकसभा निवडणूकही आगामी विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीम असणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


प्रत्येक आमदारांना आपआपल्या मतदारसंघातून मताधिक्य देणे क्रमप्राप्त असणार आहे. अन्यथा चार-सहा महिन्यांनी होणाऱ्या निवडणूकीत त्यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच जण या लोकसभा निवडणूकीला गांभिर्याने घेतांना दिसून येत आहेत.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त