Nitesh Rane : भाजपाच्या जाहिरातीमुळे पाकिस्तानी काँग्रेसच्या नेत्यांना हिरव्या मिरच्या झोंबल्या!

  128

संजय राऊत हा महाराष्ट्राचा बिलावल भुट्टो


पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या काँग्रेसला आमदार नितेश राणे यांचा दणका


मुंबई : 'भारतीय जनता पक्षाने (BJP) काल वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात दिली होती, ज्यात मतदारांना प्रश्न विचारला होता की तुम्ही निवडून दिलेल्या सरकारबद्दल जल्लोष तुम्हाला भारतात करायला आवडेल की पाकिस्तानात? यात कुठेही काँग्रेस किंवा इंडिया अलायन्सच्या कोणत्याही घटक पक्षाचा उल्लेख केलेला नव्हता. तरीही 'चोर की दाढी में तिनका' याप्रमाणे मुस्लिम लीगची बी टीम आणि पाकिस्तानी एजंट म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना हिरव्या मिरच्या ढुंगणाखाली झोंबल्या आणि लगेच साप वळवळायला लागले', असा हल्लाबोल भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. पाकिस्तानचे (Pakistan) समर्थन करणार्‍या काँग्रेसला (Congress) नितेश राणे यांनी जोरदार चपराक लगावली.


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी काल आपले असली रंग बाहेर दाखवले. कसाब आणि करकरेंच्या मधील जो घटनाक्रम त्यांनी सांगितला त्यातून त्यांनी शहिदांचा तर अपमान केलाच पण पाकिस्तानवर असलेलं त्यांचं प्रेमही दाखवून दिलं. त्यामुळे काँग्रेसला मत देणं म्हणजे भारताचा झेंडा उतरवून पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यासारखं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर, कर्नाटकात काँग्रेसची सत्ता जेव्हा आली, तेव्हा विजय मिरवणुकीत पाकिस्तान झिंदाबादचे नारे, आणि पाकिस्तानचे झेंडे फडकताना दिसले, असा आरोप नितेश राणे यांनी केला.


काँग्रेसचे नेते हे पाकिस्तानी एजंट बनून आणि स्वतःला भारतीय म्हणवून घेत इथे पाकिस्तानचं काम करतायत. पाकिस्तानमध्ये असलेल्या त्यांच्या बापाला केवळ खूश करण्यासाठी ते देशभक्त असलेल्या भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा संघटनांवर, लोकांवर, कार्यकर्त्यांवर टिकाटिप्पणी करतायत, अशी टीका नितेश राणे यांनी केली.



संजय राऊत हा महाराष्ट्राचा बिलावल भुट्टो


याच पार्श्वभूमीचा धागा धरुन आज सकाळी संजय राजाराम राऊतने (Sanjay Raut) ज्याचं मी वारंवार धर्मांतर झालंय असा उल्लेख करतो. त्यानेही अपेक्षेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि करकरेंच्या मध्ये भांडण कसं होतं, कसं काही संघांच्या लोकांनी येऊन याला सांगितलं, अशा प्रकारे हा भांडुपमध्ये बसून बिलावल भुट्टोची भाषा करतो. बिलावलने भारताबद्दल, मोदीजींबद्दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जी काही भाषा वापरली तशीच्या तशी भाषा या महाराष्ट्राच्या बिलावल भुट्टोने आज सकाळी वापरली.



पाकिस्तानमध्ये बिर्याणी पार्टी होता कामा नये


काँग्रेस नेते आणि संजय राऊतवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. निवडणुकीच्या माध्यमातून पाकिस्तानला मदत करणं, जेवढा द्वेष पाकिस्तान मोदीजींचा करतंय, तशीच भाषा वापरणं म्हणून या सगळ्या पाकिस्तानी एजंट्सवर देशद्रोहाचा खटला चालवावा आणि आपल्या भारतातील नागरिकांनी विचार करुन मत द्यावं. कारण उद्या पाकिस्तानमध्ये बिर्याणी पार्टी होता कामा नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.



रोहित पवार हा बाहेरचा पवार


रोहित पवार हे कालच्या बारामतीच्या सभेत रडताना दिसले, यानंतर अजित पवारांनी त्यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली. यावर नितेश राणे म्हणाले, रोहित पवार यांना फिल्मफेअरमध्ये कॉमेडियनचा अॅवॉर्ड जाहीर झाला असता तर तो अतिशय स्तुत्य असता. जर तो नसेल मिळाला तर मी फिल्मफेअरवाल्यांशी बोलतो आणि पुरस्कार त्यांच्या घरी पाठवून देतो. कारण असं शेंबड्या मुलांसारखं रडणं हे पवारांच्या रक्तात नाही, म्हणजे हा नक्कीच बाहेरचा पवार आहे, यावर शिक्कामोर्तब केलं पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.