Nitesh Rane : भाजपाच्या जाहिरातीमुळे पाकिस्तानी काँग्रेसच्या नेत्यांना हिरव्या मिरच्या झोंबल्या!

संजय राऊत हा महाराष्ट्राचा बिलावल भुट्टो


पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या काँग्रेसला आमदार नितेश राणे यांचा दणका


मुंबई : 'भारतीय जनता पक्षाने (BJP) काल वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात दिली होती, ज्यात मतदारांना प्रश्न विचारला होता की तुम्ही निवडून दिलेल्या सरकारबद्दल जल्लोष तुम्हाला भारतात करायला आवडेल की पाकिस्तानात? यात कुठेही काँग्रेस किंवा इंडिया अलायन्सच्या कोणत्याही घटक पक्षाचा उल्लेख केलेला नव्हता. तरीही 'चोर की दाढी में तिनका' याप्रमाणे मुस्लिम लीगची बी टीम आणि पाकिस्तानी एजंट म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना हिरव्या मिरच्या ढुंगणाखाली झोंबल्या आणि लगेच साप वळवळायला लागले', असा हल्लाबोल भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. पाकिस्तानचे (Pakistan) समर्थन करणार्‍या काँग्रेसला (Congress) नितेश राणे यांनी जोरदार चपराक लगावली.


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी काल आपले असली रंग बाहेर दाखवले. कसाब आणि करकरेंच्या मधील जो घटनाक्रम त्यांनी सांगितला त्यातून त्यांनी शहिदांचा तर अपमान केलाच पण पाकिस्तानवर असलेलं त्यांचं प्रेमही दाखवून दिलं. त्यामुळे काँग्रेसला मत देणं म्हणजे भारताचा झेंडा उतरवून पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यासारखं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर, कर्नाटकात काँग्रेसची सत्ता जेव्हा आली, तेव्हा विजय मिरवणुकीत पाकिस्तान झिंदाबादचे नारे, आणि पाकिस्तानचे झेंडे फडकताना दिसले, असा आरोप नितेश राणे यांनी केला.


काँग्रेसचे नेते हे पाकिस्तानी एजंट बनून आणि स्वतःला भारतीय म्हणवून घेत इथे पाकिस्तानचं काम करतायत. पाकिस्तानमध्ये असलेल्या त्यांच्या बापाला केवळ खूश करण्यासाठी ते देशभक्त असलेल्या भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा संघटनांवर, लोकांवर, कार्यकर्त्यांवर टिकाटिप्पणी करतायत, अशी टीका नितेश राणे यांनी केली.



संजय राऊत हा महाराष्ट्राचा बिलावल भुट्टो


याच पार्श्वभूमीचा धागा धरुन आज सकाळी संजय राजाराम राऊतने (Sanjay Raut) ज्याचं मी वारंवार धर्मांतर झालंय असा उल्लेख करतो. त्यानेही अपेक्षेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि करकरेंच्या मध्ये भांडण कसं होतं, कसं काही संघांच्या लोकांनी येऊन याला सांगितलं, अशा प्रकारे हा भांडुपमध्ये बसून बिलावल भुट्टोची भाषा करतो. बिलावलने भारताबद्दल, मोदीजींबद्दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जी काही भाषा वापरली तशीच्या तशी भाषा या महाराष्ट्राच्या बिलावल भुट्टोने आज सकाळी वापरली.



पाकिस्तानमध्ये बिर्याणी पार्टी होता कामा नये


काँग्रेस नेते आणि संजय राऊतवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. निवडणुकीच्या माध्यमातून पाकिस्तानला मदत करणं, जेवढा द्वेष पाकिस्तान मोदीजींचा करतंय, तशीच भाषा वापरणं म्हणून या सगळ्या पाकिस्तानी एजंट्सवर देशद्रोहाचा खटला चालवावा आणि आपल्या भारतातील नागरिकांनी विचार करुन मत द्यावं. कारण उद्या पाकिस्तानमध्ये बिर्याणी पार्टी होता कामा नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.



रोहित पवार हा बाहेरचा पवार


रोहित पवार हे कालच्या बारामतीच्या सभेत रडताना दिसले, यानंतर अजित पवारांनी त्यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली. यावर नितेश राणे म्हणाले, रोहित पवार यांना फिल्मफेअरमध्ये कॉमेडियनचा अॅवॉर्ड जाहीर झाला असता तर तो अतिशय स्तुत्य असता. जर तो नसेल मिळाला तर मी फिल्मफेअरवाल्यांशी बोलतो आणि पुरस्कार त्यांच्या घरी पाठवून देतो. कारण असं शेंबड्या मुलांसारखं रडणं हे पवारांच्या रक्तात नाही, म्हणजे हा नक्कीच बाहेरचा पवार आहे, यावर शिक्कामोर्तब केलं पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात