व्होट बँकेमुळे ममता बॅनर्जींचा सीएएला विरोध

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आरोप


दुर्गापुर : काँग्रेस ७०-७० वर्षांपासून राम मंदिराची उभारणी रखडवत होती, पण पंतप्रधान मोदींनी अवघ्या पाच वर्षांत मंदिर बांधलं. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पुतण्याला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पाठवले होते. पण ते अयोध्येला गेले नाहीत. ते का गेले नाहीत, हे तुम्हाला माहीत आहे का? मी सांगतो, त्यांना त्यांच्या व्होट बँकेची भीती वाटते. हे घुसखोर आले आहेत ही त्यांची व्होट बँक आहे. याचीची ममता दीदींना भीती वाटते. ममता दीदी त्यांच्या व्होट बँकेमुळे सीएएला विरोध करत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.


पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. अमित शाह यांनी सोमवारी दुर्गापुर येथील सभेत सांगितले की, दीदी दुर्गापूरमध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी १५ दिवसांपासून प्रचार करत आहेत, पण मी त्यांना आव्हान देतो, तुम्ही इथे पाच वर्षे राहिलात तरी तुम्हाला दुर्गापूर जिंकता येणार नाही. हे लोक पैसे गोळा करतात आणि ते सर्व आपल्या पुतण्यांना देतात. इंडिया आघाडीचे लोक जमले आणि घोटाळे करत आहेत. दीदींच्या मंत्र्यांच्या घरात ५० कोटींची रोकड सापडली आहे. काल रात्री झारखंडमधील एका मंत्र्याच्या घरातून ३० कोटी रुपये जप्त करण्यात आले, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.


बंगालमध्ये भ्रष्टाचार आणि निवडणुकीतील हिंसाचार सामान्य झाला आहे. आजच बॉम्बस्फोट झाला. त्यांना (ममता बॅनर्जी) लोकांना घाबरवायचे आहे, पण दुर्गापूरच्या लोकांनो लक्षात ठेवा, निवडणूक आयोगाने केंद्रीय फौजफाटा तैनात केला आहे, ममता दीदींच्या गुंडांना घाबरण्याची गरज नाही. उघडपणे मतदान करा. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणे म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जगात तिसऱ्या क्रमांकावर नेणे होय, असा दावा यावेळी अमित शहा यांनी केला आहे.

Comments
Add Comment

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा