राम मंदिरात जाण्यावरुन पक्षाचा विरोध; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा...

श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून विरोध


नवी दिल्ली ( वृत्तसंस्था): श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून विरोध होत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या प्रवक्त्या राधिका खेडा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा जोरदार प्रचार सुरु असताना, काँग्रेसला ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे


लोकसभेची निवडणूक सध्या सुरु आहे. दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यात,राधिका खेडा यांनी ट्विटर वरून राजीनाम्याची माहिती दिली. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना राधिका खेडा यांनी एक पत्र लिहिले असून त्यांनी पत्रात म्हटले आहे की, “प्राचीन काळापासून धर्माचे समर्थन करणाऱ्यांना विरोध करण्यात येत आहे. हिरण्यकशिपूपासून ते रावण आणि कंसापर्यंत अनेक अशी उदाहरणे आहेत. प्रभू श्री रामाचे नाव घेणाऱ्यांना काही लोक विरोध करत आहेत.





मात्र, प्रत्येक हिंदुसाठी श्री राम जन्मभूमी पवित्र स्थान आहे. मी ज्या पक्षामध्ये माझ्या आयुष्यातील २२ वर्षांपेक्षा जास्त वर्षे दिली, पक्षात काम केले. मात्र, आज मला त्याच पक्षाच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. मला एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे की, छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कार्यालयात मला न्याय मिळाला नाही. मी प्रत्येकांना न्याय मिळून देण्यासाठी लढले. पण आज माझ्याच पक्षात माझा पराभव झाला. पक्षाच्या वरिष्ठांना सांगूनही न्याय न मिळाल्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे”,


“आज मी अत्यंत दुःखाने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आणि माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. होय, मी एक मुलगी आहे आणि मी लढू शकते. मी आता तेच करत आहे. मी माझ्या आणि माझ्या देशवासीयांच्या न्यायासाठी लढत राहील”, असे राधिका खेरा यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या