नारायण राणेंना ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची मिळाली असती तर...राज ठाकरेंकडून कौतुक

कणकवली: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. त्यातच नारायण राणेंच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंनी सभा घेतली. यावेळी सभेदरम्यान राज ठाकरे यांनी नारायण राणेंनी केलेल्या कामाचे कौतुक केले.


नारायण राणे यांना मु्ख्यमंत्री म्हणून ६ महिने काम करायला मिळाले. मात्र जर त्यांना पाच वर्षे मिळाली असती तर आज इथे प्रचाराला कोणाला यायची गरज नसते. अशा शब्दात राज ठाकरेंनी नारायण राणेंचे कौतुक केले. कणकवली येथे राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी सभा बोलावली होती.


यावेळी सभेत बोलताना त्यांनी राणे मुख्यमंत्री असतानाचा किस्साही सांगितला,ते म्हणाले जेव्हा नारायण राणे मुख्यमंत्री झाले तेव्हा मला वाटले होते की यांना हे सगळं जमेल का? मात्र त्यांनी जे काही केले ते अनेकांनाही जमले नाही.


यावेळी त्यांनी कुपोषणाचा मुद्दा नारायण राणे यांनी सभागृहात कसा खणखणीतपणे मांडला होता. याचे उदाहरणही दिले. राज ठाकरे म्हणाले, त्यावेळी नारायण राणे हे विरोधी पक्ष नेते होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल शिरोदे अभय बंग यांना घेऊन राणेंकडे गेले होते. यावेळी कुपोषणाच्या मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा झाली. नारायण राणे यांनी सर्व काही ऐकून घेतले आणि दुसऱ्या दिवशी सभागृहात त्यांनी हा विषय खणखणीतपणे मांडला. एखाद्या विषयाचा खोल अभ्यास करणे, तसेच तो मांडणे हे त्यांना व्यवस्थित माहीत आहे.

Comments
Add Comment

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह

रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पाच पर्यटकांचा बुडून मृत्यू

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी पाच जण बुडून मरण पावले. ही दुर्घटना

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला