नारायण राणेंना ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची मिळाली असती तर...राज ठाकरेंकडून कौतुक

कणकवली: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. त्यातच नारायण राणेंच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंनी सभा घेतली. यावेळी सभेदरम्यान राज ठाकरे यांनी नारायण राणेंनी केलेल्या कामाचे कौतुक केले.


नारायण राणे यांना मु्ख्यमंत्री म्हणून ६ महिने काम करायला मिळाले. मात्र जर त्यांना पाच वर्षे मिळाली असती तर आज इथे प्रचाराला कोणाला यायची गरज नसते. अशा शब्दात राज ठाकरेंनी नारायण राणेंचे कौतुक केले. कणकवली येथे राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी सभा बोलावली होती.


यावेळी सभेत बोलताना त्यांनी राणे मुख्यमंत्री असतानाचा किस्साही सांगितला,ते म्हणाले जेव्हा नारायण राणे मुख्यमंत्री झाले तेव्हा मला वाटले होते की यांना हे सगळं जमेल का? मात्र त्यांनी जे काही केले ते अनेकांनाही जमले नाही.


यावेळी त्यांनी कुपोषणाचा मुद्दा नारायण राणे यांनी सभागृहात कसा खणखणीतपणे मांडला होता. याचे उदाहरणही दिले. राज ठाकरे म्हणाले, त्यावेळी नारायण राणे हे विरोधी पक्ष नेते होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल शिरोदे अभय बंग यांना घेऊन राणेंकडे गेले होते. यावेळी कुपोषणाच्या मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा झाली. नारायण राणे यांनी सर्व काही ऐकून घेतले आणि दुसऱ्या दिवशी सभागृहात त्यांनी हा विषय खणखणीतपणे मांडला. एखाद्या विषयाचा खोल अभ्यास करणे, तसेच तो मांडणे हे त्यांना व्यवस्थित माहीत आहे.

Comments
Add Comment

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या