Amitabh Bachchan : 'बिग बी'कडून कोस्टल रोड आणि शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक!

देवेंद्र फडणवीस यांनी फिल्मी स्टाईल मानले अमिताभ यांचे आभार


मुंबई : बहुचर्चित असलेल्या मुंबई कोस्टल रोडच्या (Mumbai Coastal Road) पहिल्या दहा किमी अंतराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यामुळे मुंबईला पश्चिम उपनगराला जोडणे शक्य झाले आहे. अनेकजण या कोस्टल रोडवरुन प्रवास करतानाचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यातच आता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी देखील नुकतेच कोस्टल रोडवरुन प्रवास करत त्यांचा अनुभव शेअर केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारचे देखील कौतुक केले आहे. त्यांच्या या ट्विटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देखिल अगदी फिल्मी स्टाईल रिप्लाय दिला आहे.


मुंबई ते कांदिवली असा या कोस्टल रोडचा प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल रोड हा १०.५८ किमी लांबीचा आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च हा १२,७२१ कोटी रुपये आहे. नुकतेच लोकार्पण झालेल्या अटल सेतूवरही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यानंतर आता कोस्टल रोडच्या कामाचे देखील कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.


अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'T 4999 - Oh ! Boy !! went to work .. after Sea Link on to Coastal Road and Tunnel underground .. JVPD, Juhu to Marine Drive , 30 mins .. !! वाह ! क्या बात है! साफ़ सुथरी नयी बढ़िया सड़क, कोई रुकावट नहीं.'


अमिताभ यांच्या ट्विटपेक्षा यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी फिल्मीस्टाईलमध्ये म्हटले आहे की, “Parampara, Pratishtha, Anushasan, Ye iss sarkar ke teen stambh hai !" e wo aadarsh hain jinse hum Bharatiyon ka kal banaate hai”..., अमिताभ जी तुम्ही तुमच्या प्रवासाचा अनुभव शेअर केलात, त्याबद्दल खूप आभार. मुंबई आता अपग्रेड होतेय आणि आम्ही मुंबईकरांसाठी वेळ वाचवणा-या प्रवासाचा अनुभव निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत.

Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री