Rohit Sharma: आयुष्यात आधीही मी...आयपीएलमध्ये कर्णधारपद घेतल्यानंतर रोहित पाहा काय म्हणाला...

मुंबई: या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२४साठी आधीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आता या बाबतीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे निवड प्रमुख अजित आगरकरही सोबत होते.


आयपीएलमध्ये रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने हार्दिक पांड्याकडे नेतृत्व दिले. यावरूनही पत्रकार परिषदेत सवाल करण्यात आले. यावर रोहित म्हणाला, हे माझ्यासाठी काही नवीन नाही. मी याआधीही अनेक कर्णधारांच्या नेतृत्वात खेळलो आहे.



मी कर्णधार, नंतर नव्हतो आणि आता कर्णधार आहे.


रोहित म्हणाला, मी कर्णधार होतो, नंतर कर्णधार नव्हतो आणि आता कर्णधार आहे. हा जीवनाचा भाग आहे. सगळं काही आपल्यानुसार होत नाही. हा एक शानदार अनुभव आहे. आपल्या माझ्या जीवनात कधीही कर्णधार नव्हतो आणि विविध कर्णधारांच्या नेतृत्वात खेळलो होते. याच्याशी काही घेणे-देणे नाही. मी नेहमी तेच करण्याचा प्रयत्न केला जे एका खेळाडूने केले पाहिजे. गेल्या एका महिन्यात हे असे करण्याचा प्रयत्न केला.


अजित आगरकर पुढे म्हणाला, रोहित एक शानदार कर्णधार आहे. ५० षटकांच्या वर्ल्डकप आणि या वर्ल्डकमध्ये ६ महिन्यांत आम्हाला काही निर्णय घ्यायचे होते. मला माहीत आहे की हार्दिकने काही मालिकेत नेतृत्व केले आहे. मात्र रोहित शानदार आहे.



राहुलला या कारणामुळे नाही निवडले


पत्रकार परिषदेत राहुलबाबत विचारण्यात आले की त्याला अखेर वर्ल्डकपमध्ये स्थान का मिळाले नाही यावर आगरकर म्हणाले, केएल राहुल शानदार खेळाडू आहे. आम्ही मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंबाबत विचार करत आहोत. केएल टॉपमध्ये फलंदाजी करतो. तर ऋषभ पंत ५व्या स्थानावर खेळतो. संजू सॅमसनही खालच्या स्थानावर फलंदाजी करू शकतो.



शिवमचे प्लेईंग ११मध्ये खेळणे मुश्किल


ऑलराऊंडर शिवम दुबेबाबत रोहित म्हणाला, आमचे टॉप फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. हे वाईट नाही. मात्र मधल्या फळीतील खेळाडूंनीही चांगली कामगिरी करावी. आम्ही दुबेला त्याच्या आयपीएलमधील कामगिरीवर निवडले आहे.



कोहलीच्या समर्थनार्थ उतरले आगरकर


विराट कोहली आयपीएल दरम्यान आपल्या स्ट्राईक रेटमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावर सवाल केला असता आगरकर म्हणाले, अनुभव खूप उपयोगी ठरतो. विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटबाबत कोणतीही बातचीत झाली नाही.



टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ


रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत(विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या(उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षऱ पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन(विकेटकीपर), मोहम्मद सिराज.

Comments
Add Comment

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील

Ben Austin Dies News : एक चेंडू, सराव आणि जीवन संपलं…भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी १७ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलिया : सध्या भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२०

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ? जाणून घ्या नियम

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ ची दुसरी सेमी फायनल आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये

भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या T- २० मॅच च्या आधी वाईट बातमी, युवा खेळाडूचा बॉल लागून मृत्यू

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ कांगारूं विरुद्ध पाच टी - २० सामन्यांची मालिका खेळत आहे. या

Shreyas Iyer Health Update : 'स्टार बॅट्समन' श्रेयस अय्यरकडून मोठी अपडेट! गंभीर दुखापतीनंतर ICU मधून भावनिक पोस्ट, चाहत्यांना दिलासा!

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज (Star Batsman) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या एका गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात उपचार घेत आहे.