Rohit Sharma: आयुष्यात आधीही मी...आयपीएलमध्ये कर्णधारपद घेतल्यानंतर रोहित पाहा काय म्हणाला...

मुंबई: या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२४साठी आधीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आता या बाबतीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे निवड प्रमुख अजित आगरकरही सोबत होते.


आयपीएलमध्ये रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने हार्दिक पांड्याकडे नेतृत्व दिले. यावरूनही पत्रकार परिषदेत सवाल करण्यात आले. यावर रोहित म्हणाला, हे माझ्यासाठी काही नवीन नाही. मी याआधीही अनेक कर्णधारांच्या नेतृत्वात खेळलो आहे.



मी कर्णधार, नंतर नव्हतो आणि आता कर्णधार आहे.


रोहित म्हणाला, मी कर्णधार होतो, नंतर कर्णधार नव्हतो आणि आता कर्णधार आहे. हा जीवनाचा भाग आहे. सगळं काही आपल्यानुसार होत नाही. हा एक शानदार अनुभव आहे. आपल्या माझ्या जीवनात कधीही कर्णधार नव्हतो आणि विविध कर्णधारांच्या नेतृत्वात खेळलो होते. याच्याशी काही घेणे-देणे नाही. मी नेहमी तेच करण्याचा प्रयत्न केला जे एका खेळाडूने केले पाहिजे. गेल्या एका महिन्यात हे असे करण्याचा प्रयत्न केला.


अजित आगरकर पुढे म्हणाला, रोहित एक शानदार कर्णधार आहे. ५० षटकांच्या वर्ल्डकप आणि या वर्ल्डकमध्ये ६ महिन्यांत आम्हाला काही निर्णय घ्यायचे होते. मला माहीत आहे की हार्दिकने काही मालिकेत नेतृत्व केले आहे. मात्र रोहित शानदार आहे.



राहुलला या कारणामुळे नाही निवडले


पत्रकार परिषदेत राहुलबाबत विचारण्यात आले की त्याला अखेर वर्ल्डकपमध्ये स्थान का मिळाले नाही यावर आगरकर म्हणाले, केएल राहुल शानदार खेळाडू आहे. आम्ही मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंबाबत विचार करत आहोत. केएल टॉपमध्ये फलंदाजी करतो. तर ऋषभ पंत ५व्या स्थानावर खेळतो. संजू सॅमसनही खालच्या स्थानावर फलंदाजी करू शकतो.



शिवमचे प्लेईंग ११मध्ये खेळणे मुश्किल


ऑलराऊंडर शिवम दुबेबाबत रोहित म्हणाला, आमचे टॉप फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. हे वाईट नाही. मात्र मधल्या फळीतील खेळाडूंनीही चांगली कामगिरी करावी. आम्ही दुबेला त्याच्या आयपीएलमधील कामगिरीवर निवडले आहे.



कोहलीच्या समर्थनार्थ उतरले आगरकर


विराट कोहली आयपीएल दरम्यान आपल्या स्ट्राईक रेटमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावर सवाल केला असता आगरकर म्हणाले, अनुभव खूप उपयोगी ठरतो. विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटबाबत कोणतीही बातचीत झाली नाही.



टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ


रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत(विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या(उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षऱ पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन(विकेटकीपर), मोहम्मद सिराज.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख