सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

  60

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी अनुज थापन या आरोपीने गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान या आरोपीचा मृत्यू झाला.


मुंबई पोलिसांनी नुकतीच ही बातमी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. पोलीस कोठडीत असताना अनुजने गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.





१४ एप्रिल रोजी सलमानच्या घराबाहेर दोन व्यक्तींनी गोळीबार केला होता. पोलिसांनी या घटनेतील काही आरोपींना अटक केली आहे.


गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरील गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले होते की, "या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल. हा महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे, इथे कुठलीही टोळी नसून पूर्ण ‘अंडरवर्ल्ड’ संपले आहे. आम्ही बिश्नोईला संपवू. पुन्हा कोणीही असा हल्ला करण्याची हिंमत करणार नाही अशी कारवाई करू."


दरम्यान, विक्की गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) या दोन आरोपींना देखील पोलिसांनी अटक केली होती. हे दोघेही बिहारमधील चंपारण येथील रहिवासी आहेत. तर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक सुरतमधील तापी नदीमध्ये सापडली. यावेळी काही जिवंत काडतूसही सापडले.


सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विक्की गुप्ता आणि सागर पाल या तरुणांनी चौकशीदरम्यान सांगितले होते की, सलमानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर ते मुंबईहून रस्त्याने सुरतला पोहोचले होते. येथून ते रेल्वेने भुजला गेले. तेथे प्रवासादरम्यान त्यांनी रेल्वे पुलावरून पिस्तूल तापी नदीत फेकले.

Comments
Add Comment

लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारणार

मुंबई : महाराष्ट्र सरकारने लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची इमारत ५ कोटी रुपयांना लिलावात जिंकली असून, तेथे छत्रपती

मराठ्यांपाठोपाठ ओबीसींसाठीही उपसमितीची स्थापना

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला.

मॅरेथॉन स्पर्धेबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात

बीड ते परळी रेल्वे मार्गाबाबत झाला हा निर्णय

मुंबई : रेल्वेमार्गापासून दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठी घोषणा

मुंबई : जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत

आंदोलन तर संपले, पण लाखोंच्या संख्येत मुंबईत आलेल्या भाकरी-चटणीचे काय? उरलेले अन्न आणि साहित्य गरजूंना केले दान

मुंबई: मराठा आंदोलनादरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून नवी मुंबईत चटणी-भाकरीच्या शिदोरीचा महापूर आला होता.