नागपुर मतदारसंघात दोन लाख मतदारांची नावे गायब

Share

भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे मागणार न्यायालयात दाद

नागपुर : नागपूर येथील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये जवळपास प्रत्येकी १५ ते २० हजार अशा पद्धतीने नागपूर मधील लोकसभा मतदारसंघांमध्ये जवळपास दोन लाख मतदारांची नावे गहाळ झाल्याचा दावा आज (मंगळवार) भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी केला आहे. याबद्दल प्रशासकीय अधिकारी यांना निलंबित करावे अशी मागणी करत याबाबत प्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचे कुकडे यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले.

नागपुरात झालेला कमी मतदान आणि त्यासाठी मतदार याद्यांमधील गोंधळ जबाबदार असल्याच्या मुद्द्यावरून प्रशासनावर खापर फोडले जात आहे. हा सारा प्रकार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामुळे झाल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी पत्रकार परिषद घेत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

कुकडे म्हणाले नागपूर लोकसभा मतदारसंघांत सुमारे २ लाखाच्या घरात मतदारांची नावे गहाळ झाली आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांत सुमारे २० हजार नागरिकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. ज्या मतदारांना मतदान करता आले नाही किंवा ज्यांना मतदानासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले अशा मतदारांकडून माहिती गोळा केली जात आहे. ही माहिती प्राप्त होताच प्रसंगी भाजप विधी आघाडीकडून न्यायालयात दाद मागणार आहोत, असेही बंटी कुकडे यांनी स्पष्ट केले.

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

18 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago