Health Tips: जेवण हाताने जेवले पाहिजे की चमच्याने? काय आहे फायदेशीर

मुंबई: हाताने जेवण्याचा काही आनंदच वेगळा असतो. अनेकदा घरातली वडीलधारी मंडळी हाताने जेवण्याबाबत सांगत असतात. मात्र आजकाल हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये अनेकजण लोक चमच्याने खाऊ लागले आहेत. भारतीय परंपरेमध्ये जेवण नेहमी जमीनीवर बसून हाताने खाल्ले जाते. जर तुम्हीही जेवण हाताने जेवत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.



हाताने जेवण करण्याबाबत काय सांगते आयुर्वेद


आयुर्वेदानुसार हाताने जेवण करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पाचही इंद्रिये आणि पचनासाठी हे चांगले असते. आयुर्वेद सांगते की आपली पाच बोटे पाच विविध तत्वांचे प्रतिनिधित्व करतात. अशातच जेव्हा आपण हाताने जेवण करतो तेव्हा जेवणाला बोटांचा स्पर्श होतो आणि आपल्या मेंदूला असा मेसेज पाठवला जातो की आपण जेवणासाठी तयार आहोत. यामुळे पाचनक्रिया सतर्क होते आणि पोटाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते.



काय म्हणते विज्ञान?


विज्ञानातही हाताने जेवण करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. हाताने जेवण केल्याने पचन सुधारते. कारण हातामध्ये असे काही बॅक्टेरिया असतात जे हानिकारक नसतात मात्र पर्यावरणातील विविध हानिकारक किटाणूंपासून ते शरीराची सुरक्षा करतात. दरम्यान, जेवणाआधी हात व्यवस्थित धुतले पाहिजेत.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात