Lok Saha Election 2024: काँग्रेस डायनासोरप्रमाणे नामशेष होईल, राजनाथ सिंहांची जोरदार टीका

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. यातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवडणुकीच्या प्रचारातील सभेदरम्यान काँग्रेसवर तिखट प्रहार करत हल्लाबोल केला आहे.


केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी २८ एप्रिलला काँग्रेसवर जोरदार प्रहार करत काँग्रेस हा नामशेष होणारा पक्ष असल्याचे म्हटले. गुजरातच्या भावनगरमध्ये सभेला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले, ज्या प्रमाणे धरतीवरील डायनासोर नामशेष झाले त्याचप्रमाणे येणाऱ्या दिवसांत काँग्रेसही होईल.



मला दया येते


राजनाथ सिंह म्हणाले, देशात जी परिस्थिती आहे त्यावरून मला वाटते की यावेळेसच्या निवडणुकीत काँग्रेस संपून जाईल. आजपासून दहा वर्षांनी जेव्हा मुलांना काँग्रेसबद्दल विचारले जाईल तेव्हा त्यांना काहीच माहीत नसेल.त्यांची दुर्दशा पाहून मला दया येते. जसे डायनासोर पृथ्वीवरून गायब झाले होते तसेच काँग्रेसही गायब होईल.



याआधीही केले डायनासोरबद्दलचे विधान


याआधी राजनाथ सिंह यांनी उत्तराखंड येथील एका सभेत काँग्रेसची तुलना डायनासोरसोबत केली होती. त्यांनी म्हटले होते की ज्या पद्धतीने जगातून डायनासोर नामशेष झाले तसेच काँग्रेसही होणार आहे. त्यांनी काँग्रेस म्हणजे बिग बॉस शोचे घर असल्याचे म्हटले होते.

Comments
Add Comment

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा