Lok Saha Election 2024: काँग्रेस डायनासोरप्रमाणे नामशेष होईल, राजनाथ सिंहांची जोरदार टीका

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. यातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवडणुकीच्या प्रचारातील सभेदरम्यान काँग्रेसवर तिखट प्रहार करत हल्लाबोल केला आहे.


केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी २८ एप्रिलला काँग्रेसवर जोरदार प्रहार करत काँग्रेस हा नामशेष होणारा पक्ष असल्याचे म्हटले. गुजरातच्या भावनगरमध्ये सभेला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले, ज्या प्रमाणे धरतीवरील डायनासोर नामशेष झाले त्याचप्रमाणे येणाऱ्या दिवसांत काँग्रेसही होईल.



मला दया येते


राजनाथ सिंह म्हणाले, देशात जी परिस्थिती आहे त्यावरून मला वाटते की यावेळेसच्या निवडणुकीत काँग्रेस संपून जाईल. आजपासून दहा वर्षांनी जेव्हा मुलांना काँग्रेसबद्दल विचारले जाईल तेव्हा त्यांना काहीच माहीत नसेल.त्यांची दुर्दशा पाहून मला दया येते. जसे डायनासोर पृथ्वीवरून गायब झाले होते तसेच काँग्रेसही गायब होईल.



याआधीही केले डायनासोरबद्दलचे विधान


याआधी राजनाथ सिंह यांनी उत्तराखंड येथील एका सभेत काँग्रेसची तुलना डायनासोरसोबत केली होती. त्यांनी म्हटले होते की ज्या पद्धतीने जगातून डायनासोर नामशेष झाले तसेच काँग्रेसही होणार आहे. त्यांनी काँग्रेस म्हणजे बिग बॉस शोचे घर असल्याचे म्हटले होते.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.