Lok Saha Election 2024: काँग्रेस डायनासोरप्रमाणे नामशेष होईल, राजनाथ सिंहांची जोरदार टीका

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. यातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवडणुकीच्या प्रचारातील सभेदरम्यान काँग्रेसवर तिखट प्रहार करत हल्लाबोल केला आहे.


केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी २८ एप्रिलला काँग्रेसवर जोरदार प्रहार करत काँग्रेस हा नामशेष होणारा पक्ष असल्याचे म्हटले. गुजरातच्या भावनगरमध्ये सभेला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले, ज्या प्रमाणे धरतीवरील डायनासोर नामशेष झाले त्याचप्रमाणे येणाऱ्या दिवसांत काँग्रेसही होईल.



मला दया येते


राजनाथ सिंह म्हणाले, देशात जी परिस्थिती आहे त्यावरून मला वाटते की यावेळेसच्या निवडणुकीत काँग्रेस संपून जाईल. आजपासून दहा वर्षांनी जेव्हा मुलांना काँग्रेसबद्दल विचारले जाईल तेव्हा त्यांना काहीच माहीत नसेल.त्यांची दुर्दशा पाहून मला दया येते. जसे डायनासोर पृथ्वीवरून गायब झाले होते तसेच काँग्रेसही गायब होईल.



याआधीही केले डायनासोरबद्दलचे विधान


याआधी राजनाथ सिंह यांनी उत्तराखंड येथील एका सभेत काँग्रेसची तुलना डायनासोरसोबत केली होती. त्यांनी म्हटले होते की ज्या पद्धतीने जगातून डायनासोर नामशेष झाले तसेच काँग्रेसही होणार आहे. त्यांनी काँग्रेस म्हणजे बिग बॉस शोचे घर असल्याचे म्हटले होते.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च