मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. यातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवडणुकीच्या प्रचारातील सभेदरम्यान काँग्रेसवर तिखट प्रहार करत हल्लाबोल केला आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी २८ एप्रिलला काँग्रेसवर जोरदार प्रहार करत काँग्रेस हा नामशेष होणारा पक्ष असल्याचे म्हटले. गुजरातच्या भावनगरमध्ये सभेला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले, ज्या प्रमाणे धरतीवरील डायनासोर नामशेष झाले त्याचप्रमाणे येणाऱ्या दिवसांत काँग्रेसही होईल.
राजनाथ सिंह म्हणाले, देशात जी परिस्थिती आहे त्यावरून मला वाटते की यावेळेसच्या निवडणुकीत काँग्रेस संपून जाईल. आजपासून दहा वर्षांनी जेव्हा मुलांना काँग्रेसबद्दल विचारले जाईल तेव्हा त्यांना काहीच माहीत नसेल.त्यांची दुर्दशा पाहून मला दया येते. जसे डायनासोर पृथ्वीवरून गायब झाले होते तसेच काँग्रेसही गायब होईल.
याआधी राजनाथ सिंह यांनी उत्तराखंड येथील एका सभेत काँग्रेसची तुलना डायनासोरसोबत केली होती. त्यांनी म्हटले होते की ज्या पद्धतीने जगातून डायनासोर नामशेष झाले तसेच काँग्रेसही होणार आहे. त्यांनी काँग्रेस म्हणजे बिग बॉस शोचे घर असल्याचे म्हटले होते.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…