farmer scheme : शेतकऱ्यांना 'या' तीन योजना ठरताहेत वरदान; होणार चांगला फायदा

जाणून घ्या कोणत्या आहेत त्या योजना?


मुंबई : कडकडीत ऊन व अवकाळी पाऊस अशा बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकाचे नुकसान होऊन जाते. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना पैसे मिळतात आणि कठीण काळात शेती करू शकतात. सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असताना आणखी तीन योजना आखल्या आहेत. या तिन्ही योजनांचा फायदा घेतल्यास शेतकऱ्यांना चांगली मदत होऊ शकते. जाणून घ्या योजनांबद्दल सविस्तर माहिती.



पंतप्रधान पीक विमा योजना


शेतात लावलेल्या पिकाचे नुकसान झाल्यावर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाते. नैसर्गिक संकट, कीड लागणे, दुष्काळ पडणे या कारणामुळे शेतकऱ्यांचे पीक गेले, नुकसान झाले तर सरकार अशा शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक वीमा योजनेच्या माध्यमातून मदत करते.



किसान क्रेडिट कार्ड


किसान क्रेडिट कार्ड हीदेखील शेतकऱ्यांसाठीची एक खास योजना आहे. ही योजना १९९८ सालापासून अस्तित्वात असून तिच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने साधारण तीन लाख रुपयांपर्यंत दिले जाते.



पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना


या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्याला अर्ज करता येतो. सहा हजार रुपयांची ही मदत शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत मिळते. प्रत्येक चार महिन्यांला ही मदत शेतकऱ्यांना दिली जाते. अधिकृत संकेतस्थळावर जाऊनही या योजनेसाठी अर्ज करता येतो.

Comments
Add Comment

Bollywood Movies : ‘आखरी सवाल’चा पोस्टर रिलीज: संजय दत्त यांचा इंटेन्स अवतार ठरतोय चर्चेचा विषय

मुंबई : निर्माते निखिल नंदा आणि संजय दत्त यांच्या निखिल नंदा मोशन पिक्चर्स बॅनरखाली बनलेला ‘आखरी सवाल’ हा

BJP : भाजपा युवा मोर्चाची युवा शक्ती जागर यात्रा

मुंबई : राज्यातील युवावर्गासह शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या युवक - युवतींशी

Education : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जून पासून नवीन अभ्यासक्रम

नागपूर : नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विविध नाविन्यपूर्ण विकास योजना, पारदर्शकता व प्रशासकीय पातळीवर होणारा

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Jofra Archer : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'!

कोलकाता : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात १५५

Sachin Pilgaonkar - Madhurani Gokhale : "कापूसकोंडा" चित्रपटातून तब्बल २२ वर्षांनी सचिन पिळगांवकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र

मुंबई : चंदेरी दुनियेत ब्रेक मिळायला अनेक ऑडिशन्स द्याव्या लागतात. पण हा असा पहिला कलाकार आहे ज्याला ऑडिशन्स न