Pratap Sarnaik : ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का प्रताप सरनाईक मैदानात?

लवकरच होणार घोषणा


ठाणे : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) दोन टप्प्याचे मतदान पार पडले तरी महायुतीमधील जागावाटप अद्याप फायनल झाले नाही. मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर या जागांवर अद्याप महायुतीने उमेदवारच जाहीर केलेले नाहीत. मात्र ठाणे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला आले असल्यामुळे या दोन्ही मतदार संघातील उमेदवारांची लवकरच घोषणा होईल, अशी माहिती मिळत आहे.


ठाणे लोकसभा मतदार संघ हा मुख्यममत्री शिंदे यांच्या गटाकडे आला असून मुख्यमंत्र्यांच्या जवळचे व विश्वासू सामजले जाणारे आमदार प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची नावे सध्या चर्चेत असून प्रताप सरनाईक यांना ठाण्यातून उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याचे समोर आले आहे. तर डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे माजी महापौर नरेश म्हस्के यांचे उमेदवारीसाठी नाव आघाडीवर असल्याचे समजते. याबाबत आज किंवा उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, ठाणे लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रविवारी राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. मात्र महायुतीतील भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकाही नेत्याने उमेदवारी अर्ज घेतला नाही. त्यामुळे महायुतीचा उमेदवार नक्की कधी जाहीर होणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment

Pradeep Rawat : लगान, गझनीतून चमकलेले; महाभारतातील अश्वत्थामा फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे ७४ व्या वर्षी निधन

मुंबई : लगान, गझनी, छावा अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारलेले महाभारतातील अश्वत्थामा फेम

UPI : आता UPI सशुल्क होणार ? लोकसभेत सादर झालेल्या विधेयकातील तरतुदी समजून घ्या

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवार ४ ऑगस्ट २०२६ रोजी लोकसभेत एक विधेयक सादर केले. या

SIR Campaign : राज्यात 'एसआयआर' मोहिमेला १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण म्हणजेच 'एसआयआर' मोहिमेला (SIR Campaign) १७ ऑगस्टपर्यंत

Bihar and Bengal : बिहार-बंगालमध्ये वीज कोसळून ११ मृत्यू , भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प; मुसळधार पावसाचा अनेक राज्यांना वेढा

नवी दिल्ली : अनेक राज्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून वाहतूक, दैनंदिन

Abbas Araghchi : परराष्ट्र मंत्री अराघची यांना हटवण्याची तयारी, इराणमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र

तेहरान : इराणच्या सत्ताकेंद्रात मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. काही खासदारांनी परराष्ट्र

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित