Pratap Sarnaik : ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का प्रताप सरनाईक मैदानात?

लवकरच होणार घोषणा


ठाणे : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) दोन टप्प्याचे मतदान पार पडले तरी महायुतीमधील जागावाटप अद्याप फायनल झाले नाही. मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर या जागांवर अद्याप महायुतीने उमेदवारच जाहीर केलेले नाहीत. मात्र ठाणे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला आले असल्यामुळे या दोन्ही मतदार संघातील उमेदवारांची लवकरच घोषणा होईल, अशी माहिती मिळत आहे.


ठाणे लोकसभा मतदार संघ हा मुख्यममत्री शिंदे यांच्या गटाकडे आला असून मुख्यमंत्र्यांच्या जवळचे व विश्वासू सामजले जाणारे आमदार प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची नावे सध्या चर्चेत असून प्रताप सरनाईक यांना ठाण्यातून उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याचे समोर आले आहे. तर डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे माजी महापौर नरेश म्हस्के यांचे उमेदवारीसाठी नाव आघाडीवर असल्याचे समजते. याबाबत आज किंवा उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, ठाणे लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रविवारी राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. मात्र महायुतीतील भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकाही नेत्याने उमेदवारी अर्ज घेतला नाही. त्यामुळे महायुतीचा उमेदवार नक्की कधी जाहीर होणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment

जेम पोर्टलवरून शालेय वस्तुंची खरेदी करताच काँग्रेसला लागल्या मिरच्या

- शालेय वस्तूंची खरेदी निविदेची चौकशी करण्याची केली मागणी - मुलांना वस्तूंचे वाटप वेळेत होऊ नये यासाठी

World Environment Day 2026 : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड येथे होणार १६ हजार वृक्षांची लागवड

- शुक्रवारी ५ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजता या उपक्रमाचा शुभारंभ - मुंबईकर नागरिकांनी या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी

Aamir Khan : आमिर खानची तिसऱ्या लग्नाची तयारी ; चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया

मुंबई : वयाच्या ६१ व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे अशी घोषणा त्याने स्वतःह एका मुलाखती

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी

Shrirampur ATS Raid : पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया नेटवर्कचा महाराष्ट्रात शिरकाव? श्रीरामपूरमध्ये ATS ची मोठी कारवाई, चार जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत चार संशयितांना

Minister Makarand Jadhav-Patil : राज्यात नवे पुनर्वसन धोरण येणार

मंत्री मकरंद जाधव-पाटील; कालानुरूप सर्व बदल समाविष्ट करणार मुंबई : राज्यातील दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी