GT vs RCB: जॅक्स-कोहलीसमोर गुजरातने टेकले गुडघे, आरसीबीने ९ विकेटनी जिंकला सामना

  56

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला ९ विकेटनी हरवले. या सामन्यात विराट कोहलीने ७० धावांची खेळी करत आरसीबीला आयपीएल २०२४मध्ये तिसरा विजय मिळवून दिला. गुजरातने पहिल्यांदा खेळताना २०० धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूच्या संघाने हे आव्हान २४ बॉल राखत पूर्ण केले.


आरसीबीची सुरूवात चांगली राहिली. मात्र फाफ डू प्लेसिस १२ बॉलमध्ये २४ धावा करून बाद झाला होता. येथून विराट कोहली आणि विल जॅक्स यांच्यात १६६ धावांची भागीदारी झाली. या दरम्यान ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले गेले. दुसरीकडे जॅक्सने सुरूवातीला संघर्ष केला. मात्र ४१ बॉलमध्ये १०० धावा करत आरसीबीला ९ विकेटनी विजय मिळवून दिला.


फाफ डू प्लेसिस बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि विल जॅक्सने ताबडतोब अंदाजात बॅटिंग केली. पहिल्या १० ओव्हरमध्ये संघाने १ बाद ९८ धावा केल्या होत्या. पुढील ५ षटकांत कोहली आणि जॅक्स मिळून ७९ धावा केल्या होत्या. यानंतर आरसीबीचा स्कोर १५ षटकांत १७७ धावा इतका झाला होता. शेवटच्या ५ षटकांत त्यांना विजयासाठी २४ धावांची गरज होती. मात्र कोहली आणि जॅक्स या सामन्याला खूप खेचू शकले नाहीत. १६व्या ओव्हरमध्येच विल जॅक्सने २९ धावा करत बंगळुरूला विजय मिळवून दिला.

Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये