मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला ९ विकेटनी हरवले. या सामन्यात विराट कोहलीने ७० धावांची खेळी करत आरसीबीला आयपीएल २०२४मध्ये तिसरा विजय मिळवून दिला. गुजरातने पहिल्यांदा खेळताना २०० धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूच्या संघाने हे आव्हान २४ बॉल राखत पूर्ण केले.
आरसीबीची सुरूवात चांगली राहिली. मात्र फाफ डू प्लेसिस १२ बॉलमध्ये २४ धावा करून बाद झाला होता. येथून विराट कोहली आणि विल जॅक्स यांच्यात १६६ धावांची भागीदारी झाली. या दरम्यान ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले गेले. दुसरीकडे जॅक्सने सुरूवातीला संघर्ष केला. मात्र ४१ बॉलमध्ये १०० धावा करत आरसीबीला ९ विकेटनी विजय मिळवून दिला.
फाफ डू प्लेसिस बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि विल जॅक्सने ताबडतोब अंदाजात बॅटिंग केली. पहिल्या १० ओव्हरमध्ये संघाने १ बाद ९८ धावा केल्या होत्या. पुढील ५ षटकांत कोहली आणि जॅक्स मिळून ७९ धावा केल्या होत्या. यानंतर आरसीबीचा स्कोर १५ षटकांत १७७ धावा इतका झाला होता. शेवटच्या ५ षटकांत त्यांना विजयासाठी २४ धावांची गरज होती. मात्र कोहली आणि जॅक्स या सामन्याला खूप खेचू शकले नाहीत. १६व्या ओव्हरमध्येच विल जॅक्सने २९ धावा करत बंगळुरूला विजय मिळवून दिला.
मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२०…
मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५…
मुंबई: पोटापासून अनेक आजार सुरू होतात. यासाठी त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असते. जर तुम्हीही पोटाच्या…
नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…
कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लाभार्थींची कसरत! अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत, दोन अटी केल्या शिथिल…
बार्बाडोस : आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार.…