GT vs RCB: जॅक्स-कोहलीसमोर गुजरातने टेकले गुडघे, आरसीबीने ९ विकेटनी जिंकला सामना

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला ९ विकेटनी हरवले. या सामन्यात विराट कोहलीने ७० धावांची खेळी करत आरसीबीला आयपीएल २०२४मध्ये तिसरा विजय मिळवून दिला. गुजरातने पहिल्यांदा खेळताना २०० धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूच्या संघाने हे आव्हान २४ बॉल राखत पूर्ण केले.


आरसीबीची सुरूवात चांगली राहिली. मात्र फाफ डू प्लेसिस १२ बॉलमध्ये २४ धावा करून बाद झाला होता. येथून विराट कोहली आणि विल जॅक्स यांच्यात १६६ धावांची भागीदारी झाली. या दरम्यान ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले गेले. दुसरीकडे जॅक्सने सुरूवातीला संघर्ष केला. मात्र ४१ बॉलमध्ये १०० धावा करत आरसीबीला ९ विकेटनी विजय मिळवून दिला.


फाफ डू प्लेसिस बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि विल जॅक्सने ताबडतोब अंदाजात बॅटिंग केली. पहिल्या १० ओव्हरमध्ये संघाने १ बाद ९८ धावा केल्या होत्या. पुढील ५ षटकांत कोहली आणि जॅक्स मिळून ७९ धावा केल्या होत्या. यानंतर आरसीबीचा स्कोर १५ षटकांत १७७ धावा इतका झाला होता. शेवटच्या ५ षटकांत त्यांना विजयासाठी २४ धावांची गरज होती. मात्र कोहली आणि जॅक्स या सामन्याला खूप खेचू शकले नाहीत. १६व्या ओव्हरमध्येच विल जॅक्सने २९ धावा करत बंगळुरूला विजय मिळवून दिला.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि