Arvinder Singh Lovely : काँग्रेसला आणखी मोठा धक्का! दिल्ली प्रदेशाध्यक्षाचा पक्षाला रामराम

पदाचा राजीनामा देत सांगितले 'हे' कारण


नवी दिल्ली : लोकसभा मतदारसंघातील (Loksabha Election 2024) काँग्रेसच्या (COngress) अडचणी थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहेत. लोकसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेसला प्रचंड मोठे धक्के सहन करावे लागले. काँग्रेसचा चेहरा मानला जाणाऱ्या अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली. यामध्ये मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरुपम तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश होता. तर आता दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अरविंद सिंग लवली ( Arvinder Singh Lovely resigns) यांनीही काँग्रेसला रामराम ठोकला आहे.


काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस दीपक बाबरिया यांच्याशी मतभेद झाल्याने अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे अरविंदर सिंग लवली यांनी आपला राजीनामा देत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच दिल्लीमध्ये काँग्रेस पक्ष ज्या पक्षाच्या विरोधात होता, त्याच पक्षासोबत काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. असे अरविंदर सिंग लवली यांनी म्हटले.



राजीनामा पत्रात काय म्हटले?


अरविंदर सिंग लवली यांनी स्वतःला दिल्ली पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास असमर्थ असल्याचे म्हटले आहे. दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, त्याबद्दल त्यांनी काँग्रसचे आभार व्यक्त केले. तर पक्ष पूर्वीच्या स्थितीत परत यावा यासाठी गेल्या ७-८ महिन्यांत दिल्लीत पक्षाची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रयत्न केले, असे अरविंदर सिंग लवली यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये जेव्हा आपल्याकडे कार्यभार सोपवण्यात आला तेव्हा पक्षाच्या युनिटची स्थिती सर्वांना माहीत आहे. तेव्हापासून विविध उपाययोजना करून पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि स्थानिक कार्यकर्त्यांना पुन्हा उत्साही करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत, असे अरविंदर सिंग लवली यांनी म्हटले आहे. तसेच, पक्ष सोडून गेलेल्या किंवा निष्क्रिय झालेल्या शेकडो स्थानिक कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना पक्षात पुन्हा सामील करून घेतले, असेही अरविंदर सिंग लवली यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

Comments
Add Comment

पोखरणमध्ये भारताचे हवाई दल करणार 'ऑपरेशन वायुशक्ती'

पोखरण : भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात

संसदीय मुत्सद्देगिरीत डॉ. श्रीकांत शिंदेंची एन्ट्री; इंडोनेशियासोबतच्या संबंधांचे करणार सारथ्य

नवी दिल्ली : भारताची 'संसदीय मुत्सद्देगिरी' (Legislative Diplomacy) जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष मा. ओम

Kerala To Be Renamed : केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता

केरळचे नाव बदलून केरळम करण्याचे विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे, जो

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली

US Tariff on India : अमेरिकेच्या टॅरिफ बदलांच्या परिणामांवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अमेरिकेने केलेल्या शुल्कातील (टॅरिफ) बदलांच्या परिणामांबाबत भाष्य करणे खूप घाईचे ठरेल, असे केंद्रीय अर्थ आणि

Gold Vs Venom : सापाचं विष सोन्यापेक्षा कित्येक पटीने महाग, जाणून घ्या

मुंबई: जगभरात सापांबाबत उत्सुकता, आकर्षण आणि भीतीची भावना कायमच पाहायला मिळते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार,