मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराचे काही ना काही आजार सुरूच होता. यातील एक म्हणजे डोकेदुखी. आज आपण जाणून घेणार आहोत की डोकेदुखी काय आहे आणि तो त्रास कमी करण्यासाठी काय उपाय करता येतील.
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातून खूप घाम येत असतो. यामुळे पाणी आणि इलेक्ट्रोलाईट्स वेगाने कमी होतात. यामुळे डिहायड्रेशनची समस्या सतावते. डिहायड्रेशनमुळे ब्लड व्हॉल्यूम कमी होतो आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजनची पूर्तता कमी होते. यामुळे डोकेदुखीची समस्या सतावते.
उच्च तापमानाचा सरळ परिणाम आपल्या शरीरावर होत असल्याने शरीराचे तापमान वाढू लागते. यामुळे हीट स्ट्रोक अथवा हीट एक्सहॉस्शनचा धोका वाढतो. यामुळेही डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी दिवसभरातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्या. यामुळे डिहाड्रेशनपासून आराम मिळेल तसेच डोकेदुखीची शक्यताही कमी होईल. दुपारच्या वेळेस जेव्हा ऊन खूप असेल तेव्हा बाहेर पडू नका. जर बाहेर जाणे गरजेचे असेल तर शरीर जितके जास्त झाकले जाईल याची काळजी घ्या. घरातील वातावरण थंड आणि आरामदायक ठेवा. एसी अथवा पंख्याचा वापर करा.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…