कोकणातील प्रवाशांसाठी खूशखबर : तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेस पावसाळ्यातही सुरु राहणार; आरक्षण झाले खुले

मुंबई : कोकणातील बहुसंख्य लोक मुंबईत स्थायिक झाले आहेत. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी कोकण रेल्वेच्या गाड्या कायम तुडूंब भरुन जात असतात. उन्हाळी सुट्ट्यांपासून गणपतीपर्यंत म्हणजे सप्टेंबरपर्यंत गावी जाण्यासाठी कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. यामुळे कोकणातील लोकांना सहज आरक्षण मिळत नाही. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडत असतात. यामुळे या मार्गावर अनेक गाड्या रद्द केल्या जातात. त्यामुळे येत्या १० जूननंतरची कोकणात जाणारी वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस (Tejas Express and Vande Bharat Express) रद्द करण्यात आल्याची माहिती आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर देण्यात आली होती. यामुळे कोकण अन् गोवामध्ये जाणारे लोक संभ्रमात पडले होते.


कोकण रेल्वे पावसाळ्यात दरडीचा धोका लक्षात घेऊन १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक लागू करते. तसेच रेल्वेचे आरक्षण प्रवासाच्या १२० दिवस आधी सुरू होते असते. यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेसचे रेल्वे आरक्षण खुले झाले नव्हते. परंतु आता या गाड्यांचे आरक्षण खुले झाले आहे. यामुळे तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेस पावसाळ्यात सुरु राहणार आहेत. त्यामुळे यासंदर्भात निर्माण झालेला गोंधळ दूर झाला आहे.


पावसाळी वेळापत्रकातही कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस धावणार आहे. मध्य आणि कोकण रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे आयआरसीटीसीच्या संकेत स्थळावर १० जून नंतरच्या या दोन रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारपासून हे आरक्षण सुरु झाले आहे. यामुळे गणेश उत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.


दरम्यान, कोकण आणि मध्य रेल्वेने कोकण मार्गावर उन्हाळी सुट्यांमध्ये ३६ विशेष वातानुकूलित रेल्वे सुरु केल्या आहेत. ही रेल्वे २६ एप्रिल ते २ जूनपर्यंत आहे. यामुळे कोकणवासीयांना वातानुकूलित रेल्वेतून प्रवाशाचा आनंद मिळणार आहे. या विशेष रेल्वेमध्ये १५ तृतीय वातानुकूलित कोच आहे. तसेच मुंबई आणि दानापूर दरम्यान दोन विशेष रेल्वे चालवली जाणार आहे. ट्रेन संख्या ०१०१७ एसी स्पेशल ट्रेन २६ एप्रिल ते २ जूनपर्यंत प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, रविवार असणार आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन रात्री सव्वा दहा वाजता ही गाडी सुटणार आहे.

Comments
Add Comment

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार