DC Vs MI: दिल्लीने दिला मुंबईला शह, १० धावांनी जिंकला सामना

DC Vs Mi: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीचा फलंदाज फ्रेजर-मैक्गर्कने फक्त २८ चेंडूत ८४ धावा करत पावरप्लेमध्येच संघाची धावसंख्या शंभरापार लावली. त्यानंतर आलेल्या शाय  होपने १७ चेंडूत ४१ धावा तर स्टब्सने २५ चेंडूत ४८ धावा करत संघाची आक्रमक खेळी सुरुच ठेवली. दिल्लीने 20 षटकात 4 गडी गमवून 257 धावा केल्या. आणि मुंबईसाठी  258 धावांचं आव्हान दिले.

दिल्लीने दिलेल्या २५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून ईशान किशन आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजीला उतरले होते. त्यांनी चांगली सुरुवातही केली होती. ईशान आक्रमक खेळत होता, तर दुसरी बाजू रोहितने सांभाळली होती. परंतु, रोहितला खलील अहमदलने बाद केले. चौथ्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शाय होपकडे झेल देत बाद झाला. रोहितने ८ चेंडूत ८ धावा केल्या.

पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मुकेश कुमारने ईशान किशनचा अडथळा दूर केला. ईशानने मुकेशविरुद्ध मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्याचा झेल अक्षर पटेलने घेतला. त्यामुळे ईशानला १४ चेंडूत २० धावा करून माघारी परतावे लागले. सूर्यकुमारने ३ चौकार आणि २ षटकार मारत आक्रमकता दाखवली, पण ६ व्या षटकात खलील अहमदने त्याला परत पाठवले.

अखेरच्या षटकात मुंबईला २५ धावांची गरज होती. सर्वांच्या नजरा तिलक वर्मावर खिळल्या. पण दोन धावांसाठी धावताना पंतने त्याला धावबाद केले. तिलकने ६३ धावा केल्या. त्यातच अखेरच्या चेंडूवर पीयुष चावला शाय होपकडे झेल देत 10 धावांवर बाद झाला. त्यामुळे मुंबईचा डाव 20 षटकात 9 बाद 247 धावांवर संपला. त्यामुळे हा सामना दिल्लीने 10 धावांनी जिंकला.

 
Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या