ICC T20 World cup : कोहली, पांड्याला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान नाही!

संजय मांजरेकर यांनी निवडले भारतीय संघाचे खेळाडू


मुंबई : क्रिकेटविश्वात सध्या आयपीएलची (IPL) जोरदार चर्चा आहे. आयपीएल संपल्यानंतर लगेच आयसीसी टी-२० विश्वचषकाचे (ICC T20 World cup) सामने सुरु होणार आहेत. यासाठी भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी भारतीय संघातील १५ खेळाडूंची निवड केली आहे. विशेष बाब म्हणजे विराट कोहली (Virat Kohli), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यासह रिंकू सिंग (Rinku Singh) आणि अर्शदीप सिंग (Arshadeep Singh) यांना भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. संजय मांजरेकर यांनी सलामीवीर म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जैस्वालची (Yashaswi Jaiswal) निवड केली आहे.


रोहित आणि यशस्वीनंतर तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. संजय मांजरेकर यांनी चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. तर यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसनला निवडले आहे. फिरकीपटू म्हणून कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना संधी दिली आहे. तर अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा आणि कृणाल पांड्याचा समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह याच्यासह आवेश खान, मोहम्मद सिराज, मयंक यादव आणि हर्षित राणाला संधी दिली आहे.



संजय मांजरेकरांनी निवडलेला संघ पुढील प्रमाणे आहे


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, ऋषभ पंत, संजू सॅमसन, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, आवेश खान, मोहम्मद सिराज, मयंक यादव, हर्षित राणा



विश्वचषकासाठी पात्र ठरलेले २० संघ


अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा

Comments
Add Comment

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ