Crime : भांडण सोडवायला गेला आणि जीवाला मुकला!

अलिबाग : अनेकदा लोक दुसऱ्यांची मदत करायला जातात. मग त्यात भांडण सोडवण्यासाठीची मदत असो वा इतर काही गरजेची मदत असो, मात्र अनेकांना त्यांनी केलेल्या मदतीची परतफेड वाईट स्वरुपात मिळते. अशीच एक धक्कादायक बातमी अलिबाग येथे घडली आहे. अलिबाग तालुक्यातील बुरूमखाण आदिवासी वाडी येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील वरसोली ग्राम पंचायत हद्दीतील बुरूमखान आदिवासी वाडी येथे संतोष बाळू वाघमारे, वय ४५ वर्षे आणि राहुल उदय वाघमारे, वय २२ वर्षे यांच्यामध्ये जुन्या वादावरून भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी संतोष यांचा मुलगा अजय तिथे गेला. याचा राग धरून राहुल वाघमारे याने दोन्ही हाताने त्याचा गाळा पकडुन त्याला खाली पाडले आणि त्याच्या छातीवर बसून पुन्हा गळा दाबला तसेच गुडघ्याने छातीवर आणि पोटावर मारहाण केली. या मारहाणीत अजय जागीच बेशुद्ध पडला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले असता, वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केले.


दरम्यान, या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आरोपी राहुल वाघमारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक