Crime : भांडण सोडवायला गेला आणि जीवाला मुकला!

अलिबाग : अनेकदा लोक दुसऱ्यांची मदत करायला जातात. मग त्यात भांडण सोडवण्यासाठीची मदत असो वा इतर काही गरजेची मदत असो, मात्र अनेकांना त्यांनी केलेल्या मदतीची परतफेड वाईट स्वरुपात मिळते. अशीच एक धक्कादायक बातमी अलिबाग येथे घडली आहे. अलिबाग तालुक्यातील बुरूमखाण आदिवासी वाडी येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील वरसोली ग्राम पंचायत हद्दीतील बुरूमखान आदिवासी वाडी येथे संतोष बाळू वाघमारे, वय ४५ वर्षे आणि राहुल उदय वाघमारे, वय २२ वर्षे यांच्यामध्ये जुन्या वादावरून भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी संतोष यांचा मुलगा अजय तिथे गेला. याचा राग धरून राहुल वाघमारे याने दोन्ही हाताने त्याचा गाळा पकडुन त्याला खाली पाडले आणि त्याच्या छातीवर बसून पुन्हा गळा दाबला तसेच गुडघ्याने छातीवर आणि पोटावर मारहाण केली. या मारहाणीत अजय जागीच बेशुद्ध पडला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले असता, वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केले.


दरम्यान, या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आरोपी राहुल वाघमारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.

Comments
Add Comment

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त राजगुरुनगर येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुणे : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

नाशिकमध्ये गाजत असलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस

अमरावती होणार उद्योगांचे नवे केंद्र! ५९० रुपयांत मिळणार जमीन

मुंबई : अमरावतीत अधिकाधिक उद्योग आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून, त्यासाठी अमरावतीत संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत

पुणे - पंचवीस जणांना मिळणार युरोपियन स्पेस सेंटरला भेट देण्याची संधी

पुणे : इस्रो आणि नासा भेटीचा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आता आणखी मोठी झेप घेणार आहेत.

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजांची २५ मार्चपासून ऑनलाईन नोंदणी

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व

Ashok Kharat case : पीडितांच्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास होणार गुन्हा दाखल

मुंबई : अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर पीडित महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल