Crime : भांडण सोडवायला गेला आणि जीवाला मुकला!

  68

अलिबाग : अनेकदा लोक दुसऱ्यांची मदत करायला जातात. मग त्यात भांडण सोडवण्यासाठीची मदत असो वा इतर काही गरजेची मदत असो, मात्र अनेकांना त्यांनी केलेल्या मदतीची परतफेड वाईट स्वरुपात मिळते. अशीच एक धक्कादायक बातमी अलिबाग येथे घडली आहे. अलिबाग तालुक्यातील बुरूमखाण आदिवासी वाडी येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील वरसोली ग्राम पंचायत हद्दीतील बुरूमखान आदिवासी वाडी येथे संतोष बाळू वाघमारे, वय ४५ वर्षे आणि राहुल उदय वाघमारे, वय २२ वर्षे यांच्यामध्ये जुन्या वादावरून भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी संतोष यांचा मुलगा अजय तिथे गेला. याचा राग धरून राहुल वाघमारे याने दोन्ही हाताने त्याचा गाळा पकडुन त्याला खाली पाडले आणि त्याच्या छातीवर बसून पुन्हा गळा दाबला तसेच गुडघ्याने छातीवर आणि पोटावर मारहाण केली. या मारहाणीत अजय जागीच बेशुद्ध पडला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले असता, वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केले.


दरम्यान, या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आरोपी राहुल वाघमारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे