Plane crashed in Rajsthan : राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचं यूएव्ही विमान कोसळलं!

सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून होते विमान


जयपूर : राजस्थानमधील (Rajsthan) जैसलमेरजवळ भारतीय हवाई दलाचे यूएव्ही विमान (Indian Air Force UAV plane) कोसळल्याची बातमी आहे. विमान नियमित उड्डाण करत असताना सकाळी ९ च्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवित वा वित्तहानी झाली नाही. विमान एका पडक्या भागात पडले आणि जळून खाक झाले. आगीच्या ज्वाळा खूप उंच होत्या, असे आजूबाजूला उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.


भारतीय वायुसेनेने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात जैसलमेरच्या पिठला भागात झाला. या घटनेची माहिती मिळताच हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी अपघातस्थळी पोहोचले. तसेच अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीची स्थापना करण्यात आली आहे, असे IAF सांगितले. अपघाताच्या कारणांबाबत सविस्तर अहवाल देण्यात आलेला नाही. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचे समजत आहे.



सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून होते विमान


स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान सीमावर्ती भागावर लक्ष ठेवण्यासाठी नियमित उड्डाण करत होते. जैसलमेरचा हा परिसर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील आहे. वाळवंटाची सीमा पाकिस्तानला लागून आहे. त्यामुळे हे विमान लक्ष ठेवून होते. मात्र, अपघातानंतर विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.

Comments
Add Comment

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा