Plane crashed in Rajsthan : राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचं यूएव्ही विमान कोसळलं!

  64

सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून होते विमान


जयपूर : राजस्थानमधील (Rajsthan) जैसलमेरजवळ भारतीय हवाई दलाचे यूएव्ही विमान (Indian Air Force UAV plane) कोसळल्याची बातमी आहे. विमान नियमित उड्डाण करत असताना सकाळी ९ च्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवित वा वित्तहानी झाली नाही. विमान एका पडक्या भागात पडले आणि जळून खाक झाले. आगीच्या ज्वाळा खूप उंच होत्या, असे आजूबाजूला उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.


भारतीय वायुसेनेने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात जैसलमेरच्या पिठला भागात झाला. या घटनेची माहिती मिळताच हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी अपघातस्थळी पोहोचले. तसेच अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीची स्थापना करण्यात आली आहे, असे IAF सांगितले. अपघाताच्या कारणांबाबत सविस्तर अहवाल देण्यात आलेला नाही. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचे समजत आहे.



सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून होते विमान


स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान सीमावर्ती भागावर लक्ष ठेवण्यासाठी नियमित उड्डाण करत होते. जैसलमेरचा हा परिसर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील आहे. वाळवंटाची सीमा पाकिस्तानला लागून आहे. त्यामुळे हे विमान लक्ष ठेवून होते. मात्र, अपघातानंतर विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.

Comments
Add Comment

मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण, पुढील पाच दिवस पावसाचे

मुंबई (प्रतिनिधी) : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन

Emergency : आणीबाणी लादणाऱ्यांनी संविधानाची हत्या केली - पंतप्रधान

नवी दिल्ली : देशावर आणीबाणी लादण्यात आली, त्या घटनेला काही दिवसांपूर्वी पन्नास वर्षे पूर्ण झाली. आपण

केरळच्या शाळांमध्ये झुंबा सक्ती

कोझिकोड : अमली पदार्थविरोधी मोहिमेचा भाग म्हणून शाळांमध्ये झुंबा नृत्याचे शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णय

Jagannath Yatra Stampede: डीएम-एसपींची बदली, दोन अधिकारी निलंबित...चेंगराचेंगरीत झालेल्या ३ मृत्यूंबाबत ओडिशा सरकारची मोठी कारवाई

ओडिशा: भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान पुरीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेत, ओडिशा सरकारने

दुचाकी वाहनांसाठी आता दोन हेल्मेटची सक्ती, परिवहन मंत्रालयाचा आदेश

मुंबई : दुचाकी वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे! रस्ते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने