Plane crashed in Rajsthan : राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचं यूएव्ही विमान कोसळलं!

सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून होते विमान


जयपूर : राजस्थानमधील (Rajsthan) जैसलमेरजवळ भारतीय हवाई दलाचे यूएव्ही विमान (Indian Air Force UAV plane) कोसळल्याची बातमी आहे. विमान नियमित उड्डाण करत असताना सकाळी ९ च्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवित वा वित्तहानी झाली नाही. विमान एका पडक्या भागात पडले आणि जळून खाक झाले. आगीच्या ज्वाळा खूप उंच होत्या, असे आजूबाजूला उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.


भारतीय वायुसेनेने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात जैसलमेरच्या पिठला भागात झाला. या घटनेची माहिती मिळताच हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी अपघातस्थळी पोहोचले. तसेच अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीची स्थापना करण्यात आली आहे, असे IAF सांगितले. अपघाताच्या कारणांबाबत सविस्तर अहवाल देण्यात आलेला नाही. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचे समजत आहे.



सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून होते विमान


स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान सीमावर्ती भागावर लक्ष ठेवण्यासाठी नियमित उड्डाण करत होते. जैसलमेरचा हा परिसर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील आहे. वाळवंटाची सीमा पाकिस्तानला लागून आहे. त्यामुळे हे विमान लक्ष ठेवून होते. मात्र, अपघातानंतर विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च