टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ झाला लीक! राहुल की आवेश कोणाची जागा झाली निश्चित

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ काही आठवड्यांवर आहे आणि लवकरच त्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. आता मीडिया रिपोर्ट्समध्ये भारतीय संघ निवडीबाबत मोठा खुलासा करण्यात आला आङे. असे सांगितले जात आहे की संघातली दुसऱ्या विकेटकीपर फलंदाजाच्या शर्यतीत संजू सॅमसनपेक्षा केएल राहुल पुढे आहे. तर गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांची नावे साधारण निश्चित आहे. दुसरीकडे रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि आवेश खान यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा लववकरच मुख्य निवड प्रमुख अजित आगरकर यांची भेट घेणार आहे. त्यादरम्यानत हे रिपोर्ट समोर आले आहेत. रोहित शर्मा २७ एप्रिलला होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्याआधी अजित आगरकर यांची भेट घेऊ शकतो. दरम्यान, केएल राहुलला बॅकअप कीपरच्या रूपात ठेवले जाईल अशी बातमी समोर आली आह. अशातच ऋषभ पंतची भारतीय संघाच्या प्लेईंग ११मधील जागा पक्की आहे. पंतने आयपीएल २०२४मध्ये आतापर्यंत ९ सामन्यांमध्ये ३४२ धावा ठोकल्या आहेत.


संजू सॅमसननेही आयपीएल २०२४मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. हंगामात एकीकडे सॅमसनने ३१४ धावा केल्या आहेत तर राहुल ३०२ धावांवर आहे. दरम्यान, राहुलला संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे.


बिश्नोई गेल्या काही मालिकांमध्ये नियमितपणे भारतीय संघात लेग स्पिन गोलंदाजाची भूमिका निभावत आहे. त्यामुळे तो या शर्यतीत आहे. मात्र सध्याच्या आयपीएलमध्ये त्याने केवळ ५ विकेट घेतल्या.

Comments
Add Comment

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला.

बुमराहसमोर वेस्ट इंडिजचा हेटमायर हतबल

कोलकाता : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा निर्णायक सामना

द. आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर ५ गडी राखून विजय

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील सुपर आठ फेरीत दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा ५ गडी राखून पराभव केला. झिम्बाब्वेचा