टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ झाला लीक! राहुल की आवेश कोणाची जागा झाली निश्चित

  41

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ काही आठवड्यांवर आहे आणि लवकरच त्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. आता मीडिया रिपोर्ट्समध्ये भारतीय संघ निवडीबाबत मोठा खुलासा करण्यात आला आङे. असे सांगितले जात आहे की संघातली दुसऱ्या विकेटकीपर फलंदाजाच्या शर्यतीत संजू सॅमसनपेक्षा केएल राहुल पुढे आहे. तर गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांची नावे साधारण निश्चित आहे. दुसरीकडे रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि आवेश खान यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा लववकरच मुख्य निवड प्रमुख अजित आगरकर यांची भेट घेणार आहे. त्यादरम्यानत हे रिपोर्ट समोर आले आहेत. रोहित शर्मा २७ एप्रिलला होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्याआधी अजित आगरकर यांची भेट घेऊ शकतो. दरम्यान, केएल राहुलला बॅकअप कीपरच्या रूपात ठेवले जाईल अशी बातमी समोर आली आह. अशातच ऋषभ पंतची भारतीय संघाच्या प्लेईंग ११मधील जागा पक्की आहे. पंतने आयपीएल २०२४मध्ये आतापर्यंत ९ सामन्यांमध्ये ३४२ धावा ठोकल्या आहेत.


संजू सॅमसननेही आयपीएल २०२४मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. हंगामात एकीकडे सॅमसनने ३१४ धावा केल्या आहेत तर राहुल ३०२ धावांवर आहे. दरम्यान, राहुलला संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे.


बिश्नोई गेल्या काही मालिकांमध्ये नियमितपणे भारतीय संघात लेग स्पिन गोलंदाजाची भूमिका निभावत आहे. त्यामुळे तो या शर्यतीत आहे. मात्र सध्याच्या आयपीएलमध्ये त्याने केवळ ५ विकेट घेतल्या.

Comments
Add Comment

IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,

IND Vs ENG Test Match Day 5: एजबॅस्टन कसोटी सामन्यात पावसामुळे पाचव्या दिवशी खेळण्यास विलंब...

पावसामुळे भारताच्या विजयाच्या आशा धूसर होण्याची शक्यता एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच

राजकारणाची क्रिकेटवर मात

भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका पुढे ढकलली मुंबई : भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होता. तिथे

बर्मिंगहॅममध्ये पाचव्या दिवशी काय होणार ?

इंग्लंड ऐतिहासिक कामगिरी करणार की भारत जिंकणार ? भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटींची मालिका सुरू आहे. पहिली

IND vs ENG Test 2 : भारताची विजयाकडे वाटचाल, ६०८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ३ विकेट गमावल्या

एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test 2 Day 4) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन