टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ झाला लीक! राहुल की आवेश कोणाची जागा झाली निश्चित

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ काही आठवड्यांवर आहे आणि लवकरच त्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. आता मीडिया रिपोर्ट्समध्ये भारतीय संघ निवडीबाबत मोठा खुलासा करण्यात आला आङे. असे सांगितले जात आहे की संघातली दुसऱ्या विकेटकीपर फलंदाजाच्या शर्यतीत संजू सॅमसनपेक्षा केएल राहुल पुढे आहे. तर गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांची नावे साधारण निश्चित आहे. दुसरीकडे रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि आवेश खान यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा लववकरच मुख्य निवड प्रमुख अजित आगरकर यांची भेट घेणार आहे. त्यादरम्यानत हे रिपोर्ट समोर आले आहेत. रोहित शर्मा २७ एप्रिलला होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्याआधी अजित आगरकर यांची भेट घेऊ शकतो. दरम्यान, केएल राहुलला बॅकअप कीपरच्या रूपात ठेवले जाईल अशी बातमी समोर आली आह. अशातच ऋषभ पंतची भारतीय संघाच्या प्लेईंग ११मधील जागा पक्की आहे. पंतने आयपीएल २०२४मध्ये आतापर्यंत ९ सामन्यांमध्ये ३४२ धावा ठोकल्या आहेत.


संजू सॅमसननेही आयपीएल २०२४मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. हंगामात एकीकडे सॅमसनने ३१४ धावा केल्या आहेत तर राहुल ३०२ धावांवर आहे. दरम्यान, राहुलला संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे.


बिश्नोई गेल्या काही मालिकांमध्ये नियमितपणे भारतीय संघात लेग स्पिन गोलंदाजाची भूमिका निभावत आहे. त्यामुळे तो या शर्यतीत आहे. मात्र सध्याच्या आयपीएलमध्ये त्याने केवळ ५ विकेट घेतल्या.

Comments
Add Comment

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय